मुंबई-
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडी ने नोटीस बजावल्या चे वृत्त आहे . मात्र, यासंदर्भात आपणास काही कल्पना नाही, असे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांना एकापाठोपाठ एक ईडीच्या नोटीस येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचेते नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी संताप व्यक्त केलाय.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, ईडीच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येतंय, पण आता ईडीला कुणीही भीत नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. पवार साहेबांना नोटीस पाठविण्यात आली होती, पुढे काय झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही ईडीची नोटीस पाठवली होती, पण पुढे काय झाल? असा सवालही मलिक यांनी विचारला आहे. ईडीकडून नोटीस पाठविण्यात येते, दोन दिवस चर्चा होते, संबंधित नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचे हे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रातील एका आयएएस अधिकाऱ्याला ईडी जॉईन होण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला, कारण ईडीमध्ये सरकारचा हस्तक्षेपण आणि राजकारण चालत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, असं उदाहरणही मलिक यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं.