नवी दिल्ली -ॲक्टीव रुग्णांची संख्या चिंता वाढवत असून देशात कोरोना रुग्णांची संख्या 36 लाखांच्या पार गेली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 81,663 ची वाढ झाली आहे. सध्या 36.44 लाख संक्रमितांवर उपचार सुरू आहे. गेल्या 7 दिवसांच्या आत 3.80 लाखांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांमध्ये 27 लाख केवळ 10 राज्यांचे आहेत.गेल्या 24 तासांमध्ये 4.14 लाख संक्रमित आढळले आहेत. नवीन रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 3,927 रुग्णांनी या महामारीमध्ये जीव गमावला आहे. खरेतर दिलासादायक गोष्ट म्हणजे 3.28 लाख रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये ही तिसरी वेळ आहे जेव्हा 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 30 एप्रिलला 4.02 लाख आणि 5 मे ला 4.12 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
भारतात एकीकडे करोना रुग्णसंख्या उच्चांक गाठत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही काळजी वाढवणारी आहे. गुरुवारी एकीकडे देशात ४ लाख १४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असताना ३९२७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या तीन हजारांच्या पुढे आहे. फक्त गेल्या १० दिवसांमध्ये देशात ३६ हजार ११० जणांचा मृत्यू झाला असून, तासाला सरासरी १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
१० दिवसांच्या कालखंडात कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याचा हा उच्चांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अमेरिकेत १० दिवसांत सर्वाधिक ३४ हजार ७९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यानंतर ब्राझीलचा क्रमांक होता. ब्राझीलमध्ये ३२ हजार ६९२ मृत्यू झाले होते. पण भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकलं असून नकोसा उच्चांक नावावर