मुंबई-माधुरी दीक्षित,श्रीराम नेने , जॉन अब्राहम, पुष्कर जोग,प्राजक्ता माळी,तुषार दळवी, महेश टिळेकर यांच्यासह सुमारे अडीच हजार मतदारांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात गेलेल्या महामंडळाच्या निवडणुकीला असलेली स्थगिती उठविण्यास आज न्यायालयाने नकार देत पुढची तारीख १२ फेब्रुवारी नंतर सुनावणी ठेवली आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एस जी दिघे यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ तारखेला मतदारांची नावे वगळल्यामुळे काही जणांनी अॅड युवराज नरवणकर यांच्या तर्फे याचिका दाखल केली होती ज्यावर न्यायालयाने सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिली होती .आणि १८ जानेवारी म्हणजे आज याबाबत सुनावणी ठेवली होती . आज कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आपले म्हणणे सादर करताना , आपण घटनेतील तरतुदीनुसारच कार्यवाही केल्याचे न्यायालयापुढे सांगण्यात आले. सभासदांनी शुल्क भरले, पावती घेतली त्यानंतर त्यांचे सभासदत्व प्रस्ताव कार्यकारिणीच्या बैठकीत संमत होणे घटनेनुसार आवश्यक आहे. मात्र अशा बैठकीत ज्यांचे प्रस्ताव ठेऊन मंजूर करण्यात आले नाही त्यांची नावे घटनेतील तरतुदीनुसारच वगळण्यात आली आहेत असे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले. तर महामंडळाच्या अन्य काही माजी संचालकांच्या वतीने लाव्कार्ता लवकर स्थगिती उठवावी आणि निवडणूक घ्यावी अशी विनंती न्यायालयात करण्यात आली .
सुमारे ६२५५ मतदारांची नावे असलेली कच्ची मतदार यादी प्रथम जाहीर करण्यात आली होती ,त्यावर हरकती सूचना आणि दुरुस्तीसाठी काही अवधी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला होता या अवधीत यातील सुमारे अडीच हजार नावांना घटनेनुसार मान्यताच देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ती वगळण्यात आली .
मात्र न्यायालयाने जर त्यांनी पैसे भरलेत, पावत्या घेतल्यात , ओळखपत्रेही मिळविली आहेत तर त्यांचा मतदानाचा हक्क तुम्हाला कसा हिरावता येईल असा सवाल करत गेल्या तारखेला या निवडणुकीस स्थगिती दिलेली आहे. दरम्यान ‘सलाम पुणे’ चे अध्यक्ष शरद लोणकर यांच्यासह दहा उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केलेले आहेत त्यानंतर हि निवडणूक प्रक्रिया न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत .