काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली . कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी चक्क धक्काबुक्की करत खाली पाडले आणि अटक केल्याच्या वृत्ताने देशभरात युपी पोलिसांच्या कृत्याबाबत संतापाची लाट पसरली असून देशभर आंदोलने करत कॉंग्रेसजन रस्त्यावर उतरत असल्याचे वृत्त हाथी आले आहे. ज्या गांधी घराण्याने देशासाठी बलिदानाची परंपरा कायम ठेवली ,देश हिताला वाहून घेतले ,त्या घराण्यातील राहुल गांधींना जर युपी चे पोलीस अशी वागणूक देत असतील तर सामान्य नागरिकांचे तिथे काय होत असेल ? असा प्रश्न यानिमित्ताने देशभर उपस्थित होत होता
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.
मला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे- राहुल गांधी
पोलिसांनी मला धमकी देत खाली पाडल्याचे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. मला एकट्याला हाथरसला जाऊ द्या असा मी पोलिसांकडे आग्रह धरला, मात्र पोलिसांनी आपला हा आग्रह मान्य केला नाही. एकट्या व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण म्हटले. मात्र पोलिस ऐकायला तयार नव्हते. आपल्याला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे, असे राहुल म्हणाले.
गावाला छावनीचे स्वरुप, मेन रोडवर बॅरिकेड लावले
पीडितेच्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला पीडितेच्या घरापर्यंत जाता येऊ नये, यासाठी गावाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मीडियालाही गावात जाण्याची परवानगी नाही. गावाच्या एंट्री पॉइंटवर एडीएम लेव्हलचे अधिकारी तैनात आहेत.
बलात्काराची पुष्टी नाही- पोलिस
हाथरसचे एसपी विक्रांत वीरने सांगितले की, अलीगड हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये पीडितेच्या शरीरावर जखमांचे निशान असल्याचे सांगितले आहे. पण, बलात्कार झाल्याची पुष्टी नाही. डॉक्टरांचे म्हणने आहे की, फोरेंसिक रिपोर्ट आल्यानंतरच बलात्काराची पुष्टी होईल.