मुंबई-कोरोनाविरुद्धलढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १९१ पोलीस अधिकारी, १३१९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरूअसून ,मुंबई १८, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३० पोलीसवीरांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे वृत्त शासकीय सूत्रांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर काल एका कार्यक्रमात बोलताना आताशासकीय कर्मचारीवर्ग यांच्यासमवेत पत्रकार ,सरपंच ,लोकप्रतिनिधी यांनाही कोरोना विरोधात लढा देताना ५० लाखाचे विमाकवच देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली