मुंबई-राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, मार्च महिन्यापासून सुरू असलेली जिल्हा बंदी अखेर उठवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसेल.शिवाय हॉटेल ,लॉजेस हे सुरु करता येतील .
राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी असेल. परंतू, अद्याप मेट्रो आणि सिनेमा गृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.
जाणून घ्या अनलॉक-4 मध्ये काय सुरू आणि काय बंद?
- शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रोला लाल सिग्नल
- चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
- मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
- राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
- खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
- टॅक्सी – 1+3 प्रवासी, रिक्षा – 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी