नव्या भारताच्या निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – भाजपा प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील

Date:

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध नवा भारत घडविण्यासाठी बळ देणारा केंद्रीय अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी दानवे पाटील म्हणाले की,  भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची बनवून प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती बनविण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाय या अर्थसंकल्पात आहेत. देश समृद्धीकडे वाटचाल करत असताना त्यामध्ये गाव, गरीब, महिला, युवा, शेतकरी, मध्यमवर्गीय, छोटे व्यापारी, लघु उद्योजक या सर्वांना महत्त्वाचे स्थान असेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. आगामी पाच वर्षांत कोणीही नागरिक घर, पिण्याचे पाणी, वीज, गॅस कनेक्शन, शौचालय अशा सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते, वीज पुरवठा, शेतमालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. महिला बचत गटांना सवलतीच्या दरात कर्ज आणि सदस्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा अशी विशेष तरतूद आहे. युवकांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि उद्योगधंद्यांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महसूली शब्दांचे जाणून घेऊया अर्थ !

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल...

विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी-प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे

▪️ सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर...

जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा, शरद पोंक्षेंनी दिला हिंदुत्वाचा नारा

पुणे- हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या, असे...