महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

Date:

हैद्राबाद -– जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर – वांगणी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील १०५० प्रवाशांची प्रशासनाने बचाव कार्य करून सुखरूप सुटका केली होती. याकामी त्यावेळी या रेल्वेतून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवास करणारे व सध्या प्रकाशगड बांद्रा येथे कार्यरत असलेले महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी आपल्या जनसंपर्क कामाच्या अनुभवाच्या अनुषंगाने दाखविलेले  प्रसंगावधान महत्वाचे ठरले होते.
विश्वजित भोसले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हजारो प्रवाशांच्या जीवावर बेतलेल्या या घटनेची माहिती तात्काळपणे प्रशासन व पत्रकार यांच्यापर्यंत पोहोचवली होती. आपला जनसंपर्क कामाचा अनुभव पाठीशी असणारे विश्वजित भोसले यांनी ट्विटर, व्हाटस्अॅप इत्यादी सोशल मीडियाचा यासाठी अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता. ज्यामुळे प्रवाशांवर ओढवलेल्या या जीवघेण्या प्रसंगाची अचूक व तात्काळ माहिती प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांपर्यंत पोहचली होती. ज्यामुळे बचावकार्यास गती मिळून प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यास मोलाची मदत झाली होती. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेकडून विश्वजीत भोसले यांच्या या कार्याचा हैद्राबाद येथे सत्कार करण्यात आला. पीआरएसआय च्या ४१ व्या परिषदेत तेलंगणाचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री व्ही श्रीनिवासन गौड यांच्या हस्ते गौरवपत्र  देवून हा गौरव करण्यात आला. यावेळी पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, माजी राष्ट्रीय अध्यक्ष समीर गोस्वामी, सचिव निवेदिता बॅनर्जी, हैद्राबाद चॅप्टरचे अध्यक्ष वेणूगोपाल रेड्डी, उत्तराखंड राज्याच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल चे डायरेक्टर जनरल राजेंद्र डोभल आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे दि. २७ जुलै २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीला पूर आल्याने या नदीच्या जवळून जाणारा रेल्वे ट्रॅक पुराच्या पाण्याखाली गेला होता. तुफान पाऊस व पूराच पाणी रेल्वे रुळांवर आल्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस त्या रात्री सुमारे सव्वा दहा पासून तब्बल १५ तास पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विश्वजित भोसले यांनी आपल्या जनसंपर्क कौशल्याचा पुरेपूर वापर करत रेल्वे प्रशासन, मंत्रालयातील अधिकारी व पत्रकारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत रेल्वेतील सत्य परिस्थितीचे चित्रण करून ते प्रशासन व पत्रकार यांच्यापर्यंत पोहचविले. त्यामुळे रेल्वे प्रशासन, इनडीआरएफ टीम, देशभरातील  विविध वृत्तवाहिन्या, दैनिक यांना मोलाची माहिती उबलब्ध होऊन बचत कार्यास मोठी गती मिळाली होती.
रेल्वेतील प्रवाशांशी संपर्क साधून आपल्याला मदत मिळेल असा त्यांना धीर देत विश्वजित भोसले यांनी रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांची माहिती, गरजेनुसार प्रवाशांचे फोटो आणि व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मीडियावर पाठविले. ते सर्व व्हिडीओ, प्रवाशांच्या मुलाखती आणि फोटो देशभरातील विविध वृत्तवाहिन्या आणि विविध माध्यमांनी दिवसभराच्या बातम्यांसाठी वापरले होते.
विश्वजित भोसले यांच्या या कामगिरीमुळे विविध मिडिया हाउसेसना महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील बातम्यांची सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. त्यामुळे अशा परिस्थितीत सोशल मिडीयावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना पायबंद बसला. तसेच ज्या प्रवाशांचे कुटुंबीय या सर्व प्रसंगांनी घाबरून गेले होते त्यांना देखील दिलासा मिळाला होता.
एक सतर्क नागरिक आणि एक तरुण जनसंपर्क अधिकारी म्हणून विश्वजित भोसले यांची ही कामगिरी लाक्षणिक ठरली आहे. विविध स्तरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात आले होते. समाजाने केलेल्या कौतुकाचा मी ऋणी असून जनसंपर्क क्षेत्रात देशात शिखर संस्था असलेल्या पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेकडून माझ्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली  व  मला गौरविण्यात आले याचा देखील मला महावितरणचा जनसंपर्क अधिकारी म्हणून विशेष अभिमान असल्याची भावना यावेळी विश्वजित भोसले यांनी व्यक्त केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...