उद्धव ठाकरेंचे आणि माझे शत्रुत्व बिलकूल नाही:असले तरीही ते आपल्याला संपवावे लागेल; देवेंद्र फडणवीसांनी घातली साद

Date:

फडणवीसांची गुगली कि आणखी कांही …?

अहमदनगर -उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही. अलीकडे शत्रूत्व पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरेंनी हेच वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही.त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या अनुभवातून शिकलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले होते का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा देतो.

देवेंद्र फडवीस मी जे बोललो ते कसे खरे होते हे तुम्हाला समजत आहे. मी जे बोललो त्यात अर्धेच खरे समजले पुढे आणखी अर्धे कळते. मी काहीही बोललो की, समोरून दुसरी गोष्ट बाहेर येते. मी हळूहळू बोललो की, सर्व गोष्टी समोरून येतील.

देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाही, त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, की, हे खरे आहे, मी पण हेच वारंवार सांगितले. आम्ही वैचारीक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक कल्चर आहे मी असे म्हणेल की, या कल्चरमध्ये आपण वैचारीक विरोधक असतो.देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात थोडे शत्रूत्व पाहायला मिळते पण ते योग्य नाहीत. ते कधीतरी आपल्याला संपवावे लागेल. जेव्हा जेव्हा मला विचारले तेव्हा तेव्हा मी हेच सांगितले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. त्यांनी दुसरा विचार पकडला. माझा दुसरा विचार आहे.

संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक आहे असे वाटते त्यांना माझ्या क्षमतांवर विश्वास वाटतो याबद्दल आभार मानुया. पण अलीकडे संजय राऊत जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्यासारख्या नेत्यांनी बोलताना वस्तूस्थिती पाहून, काही संयम पाळून बोलावे, लोकांना खरे वाटेल असे तरी बोलायला हवे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, की ‘देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...