Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवले ब्रीज ते कात्रज चौकापर्यंतच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सुरूच

Date:

महावितरणसह हजारो वीजग्राहकांना नाहक मनस्ताप

पुणे, दि. २७ जुलै २०२३:राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या वतीने नवले ब्रिज ते कात्रज चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या आजूबाजूला असलेली महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याचे काम मात्र ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला प्राधीकरणासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व इतर यंत्रणांकडून विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रास तोडण्यात येत असल्याने वीजग्राहकांसह महावितरणला खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच दोहोंचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान, खोदकामात दिवसा किंवा रात्रीच्या सुमारास भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार सतत सुरु असल्याने कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे ४५ ते ५० हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.

गेल्या पंधरवड्यात ‘एमएनजीएल’ व इतर यंत्रणेच्या खोदकामात जेसीबीद्वारे तब्बल १४ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. २२ केव्ही क्षमतेची एक वीजवाहिनी तोडल्यामुळे हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा एकाचवेळी खंडित होतो. त्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना सातत्याने युद्धपातळीवर काम करावे लागत आहे. ‘एमएनजीएल’च्या खोदकामात गेल्या १५ दिवसांत ८ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. त्यामुळे ४० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या वाहिन्या पुन्हा जोडण्यासाठी महावितरणला सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागला. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे १२ लाख युनिटचे म्हणजे सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसाना झाले. याप्रकरणी कात्रज पोलीस ठाण्यात महावितरणकडून फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाकडून (नॅशनल हायवेज अॅथोरिटी ऑफ इंडिया) रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु होण्यापूर्वी महावितरणकडून रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या व संबंधित यंत्रणा स्थलांतरीत करण्याबाबत अंदाजपत्रक मंजूर करून देण्यात आले आहे. वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याच्या कामाची जबाबदारी प्राधीकरणावर आहे. मात्र हे काम ऑक्टोबर २०२२ पासून रखडलेले आहे. विशेष म्हणजे वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्ता रूंदीकरणाचे काम करण्यात आल्याने महावितरणच्या रोड क्रॉस २२ केव्ही क्षमतेच्या सहा उच्चदाब वीजवाहिन्या १५ ते २० फूट खोल दबल्या गेल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे अत्यंत खडतर आहे व त्यासाठी मोठा वेळ लागणार आहे.  

महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरीत करण्यासाठी प्राधीकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरू करणे. वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा नाहक रोष सहन तसेच दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान महावितरणला सहन करावे लागत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...