मुंबई दि- १८ जुलै २०२३
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या ‘एक सही भविष्यासाठी’ अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज वरळी, सांताक्रुज, सायन कोळीवाडा, अंधेरी (पश्चिम), चांदीवली, दहिसर, मालाड येथील महाविद्यालयात ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
सायन कोळीवाडा येथील विद्यालंकार कॉलेज, डी एन नगर अंधेरी (पश्चिम) वालिया कॉलेज, सांताक्रुज वाकोला ब्रिज जवळील पटक हायस्कूल आणि महाविद्यालय, वरळीतील लाला लजपत राय कॉलेज, चांदिवलीतील शिंघर कॉलेज, दहिसरमधील मातृछाया कॉलेज तर मालाड येथील एमडी महिला कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.
देशाची युवा पिढी हीच खरी संपत्ती असून ‘एक सही भविष्यासाठी’ अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण जोडले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने राबवलेल्या अनेक योजना तसेच मुंबईत होणाऱ्या आयआयएम आदी निर्णयांची माहिती महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली.

