Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेतला होता ; देवेंद्र फडणवीस

Date:

पुढचा मुख्यमंत्र्यांचा कोण? याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा

सरकार बनवण्यासाठी शरद पवारांसोबत आमची बैठक झाली होती ,पण त्यांनी डबल गेम केली .

मुंबई-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच घेण्यात आला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उकल केली. शरद पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली होती आणि त्या बैठकीत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, अचानक शरद पवार यांनी माघार घेतली.

तरी देखील अजित पवार यांना विश्वास होता की, शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले. मात्र, नंतर शरद पवार आमच्या सोबत आले नाही आणि पुढे आम्हाला राजीनामा द्यावा लागला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार आहोत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना आहे. याविषयी बोलण्याचा अधिकार देखील मला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया आहे. त्यानुसार संसदीय मंडळ याविषयीचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेले सरकार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आणि स्वतः उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय या वेळीच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली.

राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत सत्तेत येण्यास नकार दिला. त्यांना खुर्ची हवी होती. त्यामुळे ते काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्याचवेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण सोबत स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करायला हवा, असा प्रस्ताव आला. या संदर्भात आमची शरद पवारांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सरकार स्थापनेचे अधिकार अजित पवार आणि मला देण्यात आले. हे सर्व ठरल्यानंतर शरद पवारांनी अचानक यातून माघार घेतली, असेही ते म्हणाले.

जाहिरात देणे हे चूक होती

एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये उत्तम समन्वय आहे. एखाद्या छोट्या गोष्टीवरून आमच्यात मतभेद होणे शक्य नाही. ती जाहिरात देणे हे चूक होती, हे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले. त्यांनी स्वतःहून मला फोन केला, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असलेला मान मी त्यांना देतो तर मी उपमुख्यमंत्री असल्याचे ते मला कधीही जाणवू देत नाहीत. आज पर्यंत कोणत्याही युती सरकारमध्ये नव्हता एवढा समन्वय आमच्या दोघांमध्ये असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

चपरासी होण्यास सांगितले असते तरी…

माझ्या पक्षाने मला उपमुख्यमंत्री करून माझा सन्मान केला. वास्तविक पक्षाने चपरासी होण्यास सांगितले असते तरी देखील मी झालो असतो. भारतीय जनता पक्ष आहे, म्हणून देवेंद्र फडणवीसचे अस्तित्व आहे. भारतीय जनता पक्ष बाजूला काढला तर देवेंद्र फडणवीस यांचे काहीच अस्तित्व नाही. त्यामुळे माझा पक्ष मला जो आदेश देईल तो मी पूर्ण पाळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मी पक्षाला म्हणालो होतो की, मला सरकारमध्ये कोणताही पद नकोय. यामुळे मला पदाची लालसा असल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल. त्यामुळे मी सरकारमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला होता. मला पक्ष संघटनेमधील काम देण्यात येईल, असे आमचे ठरले देखील होते. मात्र, नंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आघाडी सरकार चालवायचे असेल तर त्यासाठी अनुभवी व्यक्ती त्या ठिकाणी हवा होता. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला की मी उपमुख्यमंत्री पदी बसायला हवं हा माझ्यासाठी देखील धक्का होता मात्र पक्षाने दिलेला आदेश मान्य करत मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी. त्यानुसार मी उपमुख्यमंत्री झालो असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पक्षाचा तो निर्णय योग्यच होता

त्यावेळी माझी मानसिकता ही पक्ष चालवण्याची झाली होती. मात्र, अचानक मला उपमुख्यमंत्री बनायला सांगितले गेले. आज तुम्ही मला विचारलात तर आमच्या नेत्यांचा तो निर्णय योग्य असल्याचे मला जाणवते. कारण मी तिथे आहे म्हणून आमच्या पक्षाचा अजेंडा व्यवस्थित चालवतोय. आमच्या पक्षाला सांभाळतो. आमच्या सरकारला माझ्या अनुभवाचा फायदा मिळतोय. त्यावेळी पक्षाने घेतलेला तो निर्णय योग्यच होता, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...