मेट्रो व एल अँड टी च्या ढिसाळ कामांबाबत जबाबदारी कोणाची ?संदीप खर्डेकरांचा सवाल
पुणे- भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनाही महालिका आयुक्त आणि पथ विभागाने खोटे आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात संतप्त खर्डेकर यांनी आयुक्तांच्या नावे एक प्रसिद्धीपत्रक पाठविले आहे . त्यात असे म्हटले आहे कि,’
एरंडवणे व कर्वेनगर भागात मेट्रो व एल अँड टी च्या प्रलंबित कामांबाबत मी दिनांक 11 मे रोजी आपणास तक्रार अर्ज दिला होता. सदर कामं 18 मे पूर्वी पूर्ण होतील व रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल असे आपण व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र महिना उलटून गेला तरी खोदकाम जैसे थे च स्थितीत आहे. मनपा ने विठ्ठल मंदिर रस्त्यावर मेट्रो च्या खोदकामाचा भाग सोडून इतरत्र डांबरीकरण करून टाकले आहे.
तर समर्थ पथावरील महत्वाच्या शक्ती 98 चौकात ( देवेश चितळे, रमांबिका मंदिरासमोर ) एल टी ने भर चौकात खोदकाम करून अर्धवट अवस्थेत सोडले आहे व येथे बरेच दिवस कामं बंद आहे व तेथे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.… तसेच शैलेश पुलावरील कामं झाले तरी सर्वत्र राडारोडा पडलेला असून, धुळीचा प्रचंड त्रास होत आहे व तेथे मोठे पाईप देखील पडून आहेत. तरी कृपया त्वरित ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत व दुरावस्था झालेल्या समर्थ पथचे डांबरीकरण करावे. पावसाळा आलाच आहे / मग कधी डांबर मिळणार नाही, कधी प्लॅन्ट बंद असेल तर कधी धो धो पाऊस !! मात्र ह्या कारणांच्या आड प्रशासन दडेल आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागेल.यास नेमके आपण जबाबदार नाहीत काय ? तरी त्वरित हे कामं पूर्ण करावे अशी आग्रही मागणी करत आहे.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.
भाजपा प्रवक्त्यालाही दिले खोटे आश्वासन :महापालिकेचा कारभार
Date:

