पर्जन्य यज्ञातून वारकऱ्यांचे ‘वरुणराजा’ला साकडे; पाद्यपूजन सोहळ्याने भारावले!

Date:

पुणे-  सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या  हजारो  वैष्णवांनी पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे  अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे!  अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी बागुल परिवार व मित्रमंडळीने केलेल्या पाद्यपूजनाच्या सोहळ्याने वारकरी भारावले. 


  दरवर्षी माजी उपमहापौर, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल  व मित्रपरिवार आणि  पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे    वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.  यंदाही  वारकऱ्यांचे  पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले.  चौरंग पाट , सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी  हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. प्रारंभी वारकऱ्यांच्या हस्ते पर्जन्य यज्ञ संपन्न झाला. यावेळी वारकऱ्यांनी  दुष्काळ कायमस्वरूपी हटू दे, बळीराजा सुखी होऊ दे… सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे,असे साकडे वरुणराजाला घातले. माजी उपमहापौर  व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली.  सिनसन फार्मास्युटिकल केझर  व आबा बागुल मित्रपरिवार  यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉ. कल्पेश पाटील यांच्यासह मोहन आगलावे, ओमप्रसाद बिरादार , लखन पाटील यांनी वारकऱ्यांची ब्लडप्रेशर, शुगर तपासणी करून औषधोपचार केले तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्तीही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था  श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचेही  आबा बागुल यांनी सांगितले. 
यावेळी आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत.  पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या  वैष्णवांचे  पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.  कोरोनासारखे  संकट पुन्हा जगावर येऊ नये,सामान्यांचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात एकोपा कायम राहावा, बळीराजा सुखी होऊ दे   यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल   म्हणाले. 

यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे  पदाधिकारी  नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल,सागर बागुल,हेमंत बागुल  तसेच महेश ढवळे  सागर आरोळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, संतोष पवार, बाबासाहेब पोळके,सुरज सोनावणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...