छत्रपती संंभाजीनगर–
”राज्यात सध्या घटनाबाह्य सरकार बसले आहे. सर्वोच्च न्यायालायाने हे सरकार डिसमीस केलेले आहे. न्यायालयाने या सरकारला फाशी सुनावली आहे. आता फाशी द्यायचे काम जल्लादाने करायचेय असे ठणकावून सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांनी हिमतीने निर्णय घ्यावा, आम्ही त्यांचा सत्कार करू असेही म्हटले आहे.
-शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरच्या ३८ व्या शाखेच्या वर्धापन दिनानिमीत्ताने आयोजित या मेळाव्यात खासदार संजय राऊत बोलत होते.माजी खासदार चंद्रकांत खैरे,विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपुत,संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,जिल्हाध्यक्ष किशनचंद तणवानी जिल्हाध्यक्ष राजु राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप पटवर्धन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, न्यायालयाने सरकारला फाशी सांगितली. पण फाशीची शिक्षा सुनावत स्वत: न्यायालय फाशी देत नाही. त्यासाठी जल्लाद आणावा लागतो. कायदा संविधान नुसार हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आले आहे. हा निकालाचा सोपा साधा सरळ अर्थ आहे. विधानसभा अध्यक्षांनी जल्लादाचे काम केले; जे कायद्याने सांगितले तर आम्ही काम केले तर त्यांचा सत्कार करू.
संजय राऊत म्हणाले, ”मी माझ्या पक्षासाठी ठाकरे कुटुंबासाठी एकदा नाही, शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. सध्या मी महाराष्ट्रातल्या मंत्र्याची प्रकरणे बाहेर काढत आहे. आमच्यावर दोन पाच लाखांसाठी कारवाई केलीत. आता या मंत्र्यावर कारवाई करावी लागेल. दादा भुसे अब्दुल सत्तार तानाजी सावंत तुम्ही पहा भविष्यात काय होते? यांना मंत्रीमंडळात ठेवणे परवडणारे नसून लोक रस्त्यावरुन जोडे मारतील तुम्हाला २०२४ ला आम्हीच आहोत. यादी तयार ठेवा.”
संजय राऊत म्हणाले, राज्यात दंगली सुरु आहेत.औरंगजेबाची कबर इथे आणि तो जिंवत होतो कोल्हापुरात? का कबरीवरची माती का काढता? कधी कोल्हापूर संगमनेर अजून कुठे काढता तुम्हाला कुठे औरंगजेब हवा आहे. कर्नाटकात बजरंगबली कामाला आले नाही. आता टिपु सुलतान बहादुरशहा जफर कोणालाही काढा, तुम्हाला याची गरज आहे.
संजय राऊत म्हणाले, तुमचे हिंदुत्व या खानावर अवलंबून आहे. एकनाथ शिंदेना हिंदुची व्याख्या विचारा हो. तसेच अब्दुल सत्तार हिंदुत्वाचे प्रचारक आहे. काही दिवसांनी संंघाचे प्रचारकही होतील. सत्तेसाठी काहीही करतील अशी टिका त्यानी केली. कोल्हापूरच्या दंगलीत ९० ट्क्के कोल्हापूरच्या बाहेरुन आले होते. राज्यातून एका रात्रीत निरोप दिला जातो आणि त्यानंतर दंगली घडवल्या जातात.

