Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशात लोकशाही आहे, पण लोकशाही वृत्ती हवी : प्रा. अविनाश कोल्हे

Date:

पुणे- भारतीय घटना निर्मितीनंतर कालानुरूप बदल स्वीकारत आपण गेलो आहोत. घटनेत सुधारणांना वाव ठेवला आहे. घटनेमुळे देश म्हणून आपण प्रगल्भ होत गेलो आहोत. देशात लोकशाही आहे पण, नागरिकांनी लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अविनाश कोल्हे यांनी येथे केले.

‘लोकशाहीला वाचविणे हे घटनेच्या मूलभूत रचनेमुळेच शक्य आहे. कितीही खासदार निवडून आले तरी ही मूलभूत बांधणी, रचना टिकून राहिल ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगीतले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘भारतीय संविधानाची वैशिष्टये ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन ,कोथरूड येथे हे व्याख्यान शनिवार, ६ मे २०२३ रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान झाले. ‘ संविधान अभ्यासवर्ग ‘ या उपक्रमांतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले .

सचिन पांडुळे यांनी स्वागत केले. प्रा. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, सिसिलीया कार्व्हालो, अरुण गद्रे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रा. कोल्हे म्हणाले, ‘अमेरिकेची घटना ही जगातील पहिली लिखित घटना आहे. भारतीय घटना करताना ६० घटनांचा अभ्यास ३०० जणांच्या घटना समितीने केली.भारतीय घटना तयार करीत असताना प्रत्येक शब्दावर चर्चा घडलेली आहे.भारतीय लोकप्रतिनिधी हे भारतीय राज्यघटनेला उत्तरदायी आहेत.संसदेपेक्षा घटना सर्वोच्च आहे.घटनेत दिलेले मूलभूत हक्क हे बलस्थान आहे. अधिकाराबरोबर जबाबदारी दिलेली आहे.मूलभूत अधिकारावर गदा आली तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.सर्वोच्च न्यायालयाला अन्यायाची दखल स्वतःहून घेता येते,जनहित याचिका दाखल करता येते. जागतिक न्यायव्यवस्थेत ही अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे.

‘भारतात नागरी कायदा, विवाह कायदा अशा अनेक बाबतीतील कायद्यात सुधारणांना वाव आहे. मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्येदेखील नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करते.लोकशाही आहे पण, लोकशाही वृत्ती बाणविण्याची गरज आहे ‘, असेही प्रा. कोल्हे यांनी शेवटी सांगितले.

‘ लोकशाही वाचवणे हे लोकांच्या हातात आहे.आणीबाणी विरोधी आंदोलनात नागरिकांनी लोकशाही वाचवून दाखवली आहे. आताही कसोटीच्या कालखंडात आपण भारतीय नागरिक म्हणून कमी पडणार नाही. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ची ‘ गांधी दर्शन शिबिरे ‘ हा त्यातील जनजागृतीचा प्रयत्न आहे. ‘ असे प्रतिपादन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या...

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...