Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते; जयंत पाटलांचे वक्तव्य

Date:

सांगली-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यासाटी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधले वादळ शमल्यानंतर जयंत पाटील आज स्वगृही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अनेकांना जोरदार टोले हाणले.

जयंत पाटील यांनी आज ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमानिमित्त वाळवा तालुक्यातील साखराळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची चिंता, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी, असा टोला हाणला.

जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही सूचक भाष्य केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे वादळ निर्माण झोले होते. मात्र, बरेच लोक त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावे, अशी त्यांची इच्छा होती, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. हे लोक कोण, पक्षातले की पक्षाबाहरेचे, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. हा एक धक्काच होता. ज्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो. त्यावेळी आपले ध्येय होते, एक विचार होता. साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आपण सर्व अस्वस्थ झालो. आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारलीही.

जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातूनही जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणतात की, आज देशात एक वेगळी परिस्थिती आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारीने तरुण पिढी हैराण झाली आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवर भर न देता इतर गोष्टींकडे लोकांचे लक्ष वळवले जात आहे. दुर्दैवाने देशातील माध्यमेही यात सहभागी होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील पुढे म्हणतात की, महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र, ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. मात्र, माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे ध्येय आहे.

जयंत पाटील पुढे म्हणतात की, आज शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे, पण पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना काल मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत होती आणि या पुढेही जोमाने लढत राहणार.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...