मानवतेचा, बंधुतेचा धर्म मनामनात रुजायला हवा

Date:

शिवव्याख्याते प्रदीप कदम यांचे प्रतिपादन; तेराव्या धर्ममैञी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन
पुणे : “समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याने सामाजिक अस्थिरता निर्माण होत आहे. या अस्थिरतेची चौकट ओलांडून सर्व धर्माचे सार असलेल्या बंधुतेचा, मानवतेचा विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजायला हवा. समाजातील भरकटलेली व्यवस्था मानवतेच्या धाग्याने बांधता येईल,”असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रदीप कदम यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेच्या वाघोली येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बीजेएस सभागृहात आयोजित तेराव्या धर्ममैञी विचारवेध संमेलनाच्या उद्घाटनावेळी प्रदीप कदम बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
प्रसंगी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, मधूश्री ओव्हाळ आणि गुलाब राजा फुलमाळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण, तसेच कवी शंकर आथरे लिखित ‘बंधुतेचे विस्तिर्ण क्षितीज’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
प्रदीप कदम म्हणाले, “मानवता धर्माच्या पलीकडे आहे, हा विचार समाजात पेरण्याचे कार्य महापुरुषांनी केले. मानवतेचे तत्व आणि कल्याणाचा विचार हा प्रत्येक धर्मात आहे. साहित्यिकांमध्ये मानवतेचा विचार घडवण्याची ताकद असते. संमेलनाच्या माध्यमातून बंधुतेचा हा यज्ञ तेवत आहे, ही समाजाच्या एकोप्यासाठी महत्त्वाचे आहे. महापुरुषांच्या विचारांचा सकारात्मक वेध घेतल्यास बंधुता, मानवतेचे दर्शन घडते.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना माणूस होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीचे लेबल न लावता बहुभाषीय, बहुधर्मीय होत आम्ही सारे भारतीय आहोत, हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे. पुस्तके वाचायला लावणारी संमेलने होतात. मात्र, हे संमेलन माणूस वाचायला लावणारे आहे.”

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बंधुता परिषद बंधुतेचा प्रचार आणि प्रसार करत आहे. समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका जपण्यासाठी अशा जबाबदार संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.”

सूत्रसंचालन संगीता झिंजुरके यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले.
प्रबोधन यात्री कविसंमेलन-दुपारच्या सत्रात ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन याञी काव्यसंमेलन झाले. कवी चंद्रकांत वानखेडे, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगीता झिंजुरके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी यामध्ये सहभागी झाले होते. मधुराणी बनसोड यांच्या ‘सन्मार्ग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. तसेच बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...