पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे- लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन

Date:

पुणे :-  आपल्या भोवतालच्या पर्यावरण रक्षणात आपली जबाबदारी प्रत्येक सुज्ञ नागरिकांने ओळखली पाहिजे. त्यानुसार कृती करून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्याचे संवर्धन देखील करावे. विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती प्रार्थना सभागृह, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटचा समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

या प्रसंगी अमेरिकन गांधी बर्नी मेयर, नवी दिल्ली येथील इंडियन काउंसिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्चचे अध्यक्ष डाॅ. आर. सी सिन्हा, नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषदेचे सचिव प्रा. अंबिका दत्ता शर्मा, दिल्ली विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. अशोक व्होरा, जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्सचे अधिष्ठाचा प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय सहविश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, विश्वस्त डाॅ. चंद्रकांत पांडव, एमआयटी डब्ल्युपीयुचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एस. परशूरामन, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरू प्रा. डी. पी. आपटे, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस हे उपस्थित होते.
यावेळी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय दर्शन परिषद व नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफीकल रिसर्च यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना त्यांनी केलेल्या  अद्वितिय कार्याबद्दल “विश्व-विज्ञान-दार्शनिक” पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, पर्यावरणाच्या रक्षणाससोबतच संस्कृती जतनाचे काम व्हावे. वृक्ष जीवनाला जोडतात. विकास आणि पर्यावरण एकमेकास पुरक आहेत. नदीवरील अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नदीचे प्रवाह नष्ट केल्यामुळे त्याचे परिणाम भागावे लागत आहेत. महिला ही नदीचे रुपक आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सृष्टीत फेरबदल होत आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. विनोबा भावे म्हणातात  कोणतेही काम करताना भावनेचा ओलावा असावा. आस्था आणि श्रद्धेने आणि समाधानाने काम करावे. तत्वज्ञानाच्या मागील भावना समजून घ्यावी. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. विश्वाला ज्ञान देण्याचे कार्य या घुमटाद्वारे होईल. कल्पनेला स्वप्नात पाहणे आणि ती सत्यात उतरविण्यासाठी सहकार्या सोबत घेऊन कृती करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे. भारतात सुसंस्कृत आणि ज्ञानी समाज बनवायचा आहे. वेदात सर्व ज्ञानाची कल्पना आहे. विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान या तिन्हीच्या माध्यमातून आपल्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. भारताला विश्वगुरू कसे बनवावे या कल्पनेला युवकांनी मुर्त रुप द्यावे. डाॅ. कराड यांनी उभारलेला जगातील सर्वात मोठा घुमट हा ज्ञान केंद्र म्हणून उदयास येईल.

डॉ. विजय भटकर म्हणाले, विज्ञान, तत्वज्ञान, धर्म यांचा जागर गेली तीन दिवस या जगातील सर्वात मोठ्या घुमटात होत आहे. समाजासाठी काय आवश्यक आहे याविषयावर आणि जगात शांती नांदावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. संत ज्ञानेश्वर, जगतगुरू तुकाराम आणि शंकाचारार्या हे तत्वज्ञ होत. मुस्लिम धर्म नेता वेद आणि हिंदु संस्कृतीची बाब अधोरेखित करतो, हेच या परिषदेचे मोठे यश आहे. मानवतेच्या कल्याणासाठी धर्म, पंथ, भेदभाव विसरून एकत्र येण्याची ही सुरूवात आहे.

डॉ. आर. सी. सिन्हा म्हणाले, तत्वज्ञ हा सिस्टिम बसवतो. शंकराचार्य यांच्यानंतरचे तत्वज्ञ आणि तत्वज्ञता यांची पुन्हा रिडिफाईन करण्याची गरज आहे. तत्वज्ञ हा एका आडियाला इतर आडियाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. धर्म हा एकात्मतेचा संदेश देतो.

प्रा. अंबिका दत्ता शर्मा म्हणाले, यश, किर्ती आणि प्रतिष्ठा तेव्हाच मिळते जेव्हा त्या व्यक्तीकडे अधिक गुणसंपन्नता असेल. सर्व धर्म समभावाचा संदेश संतांनी दिला. ज्ञान अनमोल आहे. ते अमुर्त रूपात असते. त्याला मुर्त स्वरूप देण्याचे कार्य शिक्षक करतात.

डॉ. अशोक व्होरा म्हणाले, संतांना तत्वज्ञ मानण्याची सुरूवात या शतकात सुरू झाली. यात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम यासारखे अनेक संतांना आज तत्वज्ञ म्हणून ओळखले जात आहे.

पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, पूर्णब्रम्हयोगिनी त्यागमुर्ती प्रयाग अक्का कराड, संत ज्ञानेश्वर आणि जगतगुरू संत तुकाराम यांनी जीवनाचा मार्ग दाखविला. संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी जगाला सत्याचा मार्ग दाखविला. मानव कल्याणासाठी आणि भारतीय संस्कृती, परंपरेच्या स्वरुपाचे दर्शन या घुमटातून मिळत राहिले. सर्व धर्म एकच आहे. शांतीपूर्ण समाज निर्मितीची सध्याच्या काळात गरज आहे. शांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. या घुमटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे वेगळे स्वरूप जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, वैश्र्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडणार आहे.

या समारोप समारंभात तीन  दिवस चाललेल्या पाचव्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये सात ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. त्याचे वाचन प्रा.डाॅ. आर.एम.चिटणीस यांनी केले.

राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले. प्रा.डाॅ. मिलिंद पांडे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी...

सुनेत्रा पवार यांनी म्हटले,’ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प

पुणे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी नंतर जनतेसाठी एक...

सुनेत्रा पवार म्हणाल्या ,मोदींच्या शुभेछ्या प्रेरणादायी ….

कुटुंबाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवारांना मिळाल्या...