Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संगीतामुळे मनाचा एक आयाम जागृत होतो – गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांचे प्रतिपादन

Date:

पुणे:“समग्र विश्‍व कसे चालते, याचा वेध घेण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यात संगीत कला ही एक सर्वात महत्वपूर्ण साधना आहे. भावना, बुध्दी, तर्क आणि भक्तीने याची अनुभूती घेता येऊ शकते. संगीतामुळेच मनाचा एक वेगळाच आयाम जागृत होतो,”असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी व्यक्त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्‍वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, प्रा. सुनिता मंगेश कराड व एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनिवास भीमसेन जोशी म्हणाले,“ संगीत हे जसे ईश्‍वर प्राप्तीचे एक साधन मानले जाते, तसेच, निखळ आनंद आणि चिंतामुक्त व्हावयाचासुध्दा तो एक उत्तम मार्ग आहे. येथे ज्ञानाची प्राप्ती करावयाची असते. असा संगीतमय कार्यक्रम हा निसर्ग रम्य ठिकाणी झाल्याने आपल्याला ईश्‍वर प्राप्तीची अनुभूति येते. अशा भव्य दिव्य परिसरात सदैव संगीत आणि ज्ञानसाधनेचे कार्य अविरत चालत रहावे.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“संगीताच्या माध्यमातून शांतीकडे कसे पोहचता येईल ही विचारधारा घेऊन डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी हा महोत्सव सुरू केला. संपूर्ण विश्‍वात नववर्षाचा जल्लोष केला जातो. परंतू येथे भारतीय परंपरेला धरून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारत देशात सर्व प्रकारच्या विचारधारा आहेत. त्यामुळे येथे पाश्‍चात्य आणि पौर्वात्य यांचा मिलाफ दिसून येतो. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयातून जगात सुख, शांती आणि समाधान प्राप्त करता येऊ शकते. या वर्षी भीमसेन जोशी आणि मंगेशकर घराण्याचा येथे मिलाफ दिसून येतो.”
प्रा.ज्योती कराड-ढाकणे म्हणाल्या, “सरत्या वर्षात प्रत्येकाला काही चांगल्या व वाईट गोष्टींचा अनुभव आला असेल. त्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहाने करतांना येथील होम हवनात आपल्यातील वाईट गोष्टींची आहूती देऊन नवीन संकल्प सोडवा. या संगीत महोत्सावाच्या सुरूवातीच्या काळात येथील मेघडंबरीमध्ये देशातील सर्व प्रसिद्ध गायकांनी उपस्थिति दर्शवून आपली कला सादर केली. त्यावेळेस श्रोते नदीच्या काठावर बसून त्याचा आस्वाद घ्यायचेे. अशी संकल्पना डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सुरू केली. हा कार्यक्रम देशातील अग्रणी आहे. त्याप्रमाणे येथे संगीत अकादमी चालत असल्यामुळे पुण्यातील दर्दी श्रोत्यांनी याचा आस्वाद घ्यावा.”
डॉ. सुनील राय म्हणाले,“ भारतात संगीताची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेला जागविण्याचे काम सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे. नववर्षाचे स्वागत पाश्‍चात देशांमध्ये विशिष्ठ पद्धतीने साजरे केले जाते. मात्र एमआयटी सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक परंपरा रूजविण्यासाठी नववर्षाचे स्वागत केले जाते. भविष्यात युरोप आणि अमेरिकेत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करून नव वर्षाचे स्वागत करतील.”
आदिनाथ मंगेशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केेले. प्रा. अशोक घुगे व प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने झाली. श्रृती देवस्थळी, तेजस उपाध्ये व गोदावरीताई मुंडे यांनी आपली कला सादर केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...