एमसीई सोसायटीच्या ‘वैज्ञानिक भारत 2016’ स्पर्धेस उत्तम प्रतिसाद पुण्यातील 21 शाळांमधून 51 संघांचा स्पर्धेत सहभाग
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पै आय.सी.टी.अॅकॅडमी’ आणि ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘वैज्ञानिक भारत 2016’ या उपक्रमातंर्गत ही स्पर्धा नुकतीच आझम कॅम्पस येथे घेण्यात आली होती. सहभागी संघातील वरिष्ठ गटामध्ये ‘द बिशप्स् स्कूल’ हे ‘सर सी.व्ही. रमण फिरता करंडकाचे मानकरी ठरले. तर ‘लेडी तहेरून्नीसा हायस्कूल’ ने कनिष्ठ गटाचा फिरता करंडक पटकाविला.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिके देण्यात आली. यावेळी मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष), एम.सी.ई सोसायटी संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, ‘पै आय.सी.टी.अॅकॅडमी’च्या संचालक मुमताझ सय्यद, ‘वैज्ञानिक भारत 2016’ उपक्रमाचे संचालक प्रा. ऋषी आचार्य, वैज्ञानिक भारत 2016’ उपक्रमाचे समन्वयक रशल ठाकरे आणि सिंहल कोचिगं क्लासेस (पुणे )च्या फातिमा मॅडम उपस्थित होत्या.
पुण्यातील नामवंत 21 शाळांमधून 51 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये ‘द बिशप्स् स्कूल’, ‘दिल्ली पब्लिक स्कूल’, ‘सरदार दस्तूर होशांग बॉईज स्कूल’, ‘एम टी कारमेल हायस्कूल’, ‘मन्सुखभाई कोठारी नॅशनल स्कूल’, ‘विबग्योर हायस्कूल (बालेवाडी), ‘आर्यन वर्ल्ड स्कूल’, ‘एस बी पाटील स्कूल’ (रावेत), ‘लेडी तहेरून्नीसा हायस्कूल’ या शाळांचा समावेश होता.
सहभागी संघाची वैज्ञानिक विचार आणि स्पष्टता, सर्जनशील क्षमता, गंभीर विचार, टीम वर्क, सादरीकरण कौशल्य या नुसार चाचणी करण्यात आली. आणि त्यानुसार स्पर्धेचा निकाल काढण्यात आला.
वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. ‘वैज्ञानिक भारत 2016’या उपक्रमाद्वारे विज्ञान क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती घडवून आणण्यास उपयोगी ठरणार आहे, असे मत आबेदा इनामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
प्रा. ऋषी आचार्य म्हणाले, ‘21 व्या शतकात जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार व्यावसायिकता आणि प्रशिक्षण यामध्ये एक प्रकारचे अांतर निर्माण झाले आहे. याबाबतचे ज्ञान शाळा आणि महाविद्यालयांमधून मिळू शकते. या ‘वैज्ञानिक भारत 2016’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एका चाकोरी बाहेर जाऊन विचार करायला संधी मिळाली असून, हे आंतर कमी करून उद्दीष्ठ गाठण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही भविष्यात अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत.’
मुमताझ सय्यद म्हणाल्या, ‘आजच्या 21 व्या शतकातील जागतिक बाजारात वैज्ञानिक स्वभाव, गंभीर विचार, समस्या सोडवणे आणि सहयोगी कौशल्य याची मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वास्तविक जीवनातील सर्जनशीलता आणि नाविन्यता यामधील योग्य दिशा दाखवणे हा या स्पर्धेचा प्रमुख हेतू होता.
या उपक्रमातंर्गत विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी http://www.ictacademypune.com या संकेत स्थळावर संपर्क साधावा.