युद्ध नाही ,संवाद हाच उपाय :स्वामी अग्निवेश -‘गांधी सप्ताहाचा ‘ कोथरूड मध्ये समारोप

Date:

पुणे-

‘ युद्ध नाही ,संवाद हाच उपाय आहे ,संविधानात संवादाचे महत्व अधिक ‘ असल्याचे प्रतिपादन आज स्वामी अग्निवेश यांनी केले ‘.
महाराष्ट्र  गांधी स्मारक  निधी ‘ आयोजित ‘गांधी सप्ताह ‘ या उपक्रमाचा समारोप करताना प्रश्नोत्तरात  ते  बोलत होते . अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक  निधीचे  अध्यक्ष डॉ . कुमार सप्तर्षीं हे  होते . हा कार्यक्रम गांधी  भवन  येथे  झाला .
‘ शस्रास्त्र स्पर्धा  न करता ,शस्त्र सामग्री उत्पादक देशांना बळी न पडता ,युद्ध साहित्यावर चा खर्च गरिबांच्या विकासासाठी उपयोगात आणणे आवश्यक असल्याने युद्ध त्याज्य मानावे ‘ असा विचार  स्वामी अग्निवेश  यांनी  मांडला .
ते  म्हणाले ,’ युद्ध कधीही योग्य असू शकत  नाही . जगात भस्मासुर निर्माण करणाऱ्यांना त्रास झालेला आहे . शस्त्रात्रांच्या खरेदीवर खर्च  होणारी  रक्कम ५ टक्के  कमी  केली  तरी  जगातील गरिबांची  उन्नती  शक्य  आहे .  . २१ व्या शतकात  युद्ध  नाही ,तर मनापासून  साधलेला  संवाद यापेक्षा  दुसरा  मार्ग  नाही . ‘
 एकमेकांशी  युद्ध  करू  पाहणारे  भारत -पाकिस्तान  देश हे  अमेरिकेकडूनच  शस्त्रास्त्र खरेदी  करतात याकडे त्यांनी  लक्ष वेधले . दहशतवाद्यांना कोण  निर्माण  करते  याकडेही  लक्ष देण्याची गरज आहे .
प्रश्नोत्तराआधी आधी  भाषणात  बोलताना  स्वामी  अग्निवेश म्हणाले ,’डॉ . कुमार  सप्तर्षी  हे  गांधीजींची  विचारधारा ,परंपरा  पुढे नेण्याचे काम प्रामाणिक पणे करीत  आहेत . आम्ही  जनता  पक्षात  एकत्र  काम  केले  आहे . पुणे  ही ऐतिहासिक  नगरी आहे . पण  ,येथेही  असहिष्णुता  वाढत आहे . देशात  डॉ . दाभोळकर ,गोविंद  पानसरे ,डॉ कलबुर्गी  यांच्या  हत्या  होत आहेत . भांडारकर  सारख्या  संस्थेवर  हल्ले होत आहेत . अशा  वेळी  ‘गोली से नही ,बोली  से ‘ प्रगतीचा मार्ग दिसेल हे लक्षात ठेवले पाहिजे .
किमान  समान कार्यक्रम  ‘ घेऊन सर्वानी  पुढे आले पाहिजे  त्यात जातीवाद  मुक्त समाज ,अस्पृश्यता मुक्ती ,स्त्री  -पुरुष समानता ,अंध  श्रद्धा  निर्मूलन ,वेठबिगारी -बालमजुरी  मुक्ती ,भूक मुक्ती ,भ्रष्टाचार आणि शोषण मुक्त समाज ,पशु हत्या मुक्त समाज ,घडविन्याची  गरज आहे .
डॉ कुमार  सप्तर्षी यांनी जिल्ह्या -जिल्ह्यात आंतर जातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे ‘अभिनंदन  संमेलन  ‘ घ्यावे अशी सूचनाही त्यांनी केली . ज्यांना  आरक्षणाचे  फायदे  अनेकदा मिळाले  त्यातील किमान  २५ जणांनी ‘मला आरक्षण  नको ‘ असे सांगायला पुढे आले पाहिजे,असे मतही त्यांनी  व्यक्त  केले .
महापौर प्रशांत  जगताप  म्हणाले ,’गांधीजींचा  विचार हा पुढील  पिढयांना आशेचा किरण आहे . गांधी  सप्ताह ‘च्या निमित्ताने  नवी  पिढी आस्थेने  या  विचाराभोवती  जमते आहे ,हे  चित्र आनंददायक आहे . समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे प्रयत्न होत असताना ही आस्था उपयोगी ठरेल  ‘.  डॉ . कुमार  सप्तर्षी  यांनी समारोप केला
संदीप बर्वे यांनी सूत्र संचालन केले . अप्पा अनारसे  यांनी आभार मानले
व्यासपीठावर अन्वर राजन उपस्थित होते . सभागृहात डॉ उर्मिला  सप्तर्षी ,मिलिंद वालवडकर,तोडणकर गुरुजी ,अंजली सोमण  उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...