Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘जातीय जाणीवा टोकदार करण्यापेक्षा वर्गीय लढा लढण्याची गरज’: ‘जात, आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीज’ परिसंवादातील सूर

Date:

पुणे :
‘जागतिकीकरणाने निर्माण झालेले विकासाचे प्रश्‍न मांडण्याची सुवर्णसंधी मोर्चेकर्‍यांना मिळत असताना जातीय जाणीवा टोकदार करण्यापेक्षा वर्गीय लढा लढण्याची गरज आहे.’ असा सूर  गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘जात, आरक्षण आणि अ‍ॅट्रोसिटी’या परिसंवादात उमटला.
गांधी सप्ताहनिमित्त आयोजित हा परिसंवाद ‘गांधी भवन’ कोथरूड येथे झाला. यात राजेंद्र कोंढरे, प्रा. डॉ. नितेश नवसागरे, प्रा. डॉ. प्रकाश पवार सहभागी झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.
राजेंद्र कोंढरे म्हणाले, ‘एरवी मोर्चांना 200 लोक येत नसत. मात्र, यावेळी लाखो जण मराठी क्रांती मोर्चाला आले. कारण विखुरला गेलेला समाज एकत्र आला. खदखद होती, ती बाहेर आली. आतापर्यंत मराठा व्यासपीठावर येण्याची, मराठ्यांचे प्रश्‍न मांडण्याचा संकोच मराठा राजकारण्यांना तथाकथित पुरोगामीत्वामुळे वाटत होता. त्यामुळे मुलभूत प्रश्‍न दुर्लक्षित राहिले होते. माध्यमात पाटलाची प्रतिमा जी रंगवली गेली, तीच समाजाची प्रतिमा आहे, असे मानले गेले, मराठा समाजाच्या प्रगतीसाठी उद्योग, स्वयं रोजगार देणारी सरकारी संस्थाही स्थापन केली पाहिजे. सामाजिक समतेबरोबर आर्थिक समतेचीही गरज आहे.’
प्रा. नितेश नवसागरे म्हणाले, ‘सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाबाबत चर्चा कमी आणि कांगावा जास्त आहे. विकासाच्या मुलभूत प्रश्‍नाला हात घातला पाहिजे. कोपर्डीनंतर प्रकाश आंबेडकर, आठवले यांना कोपर्डीत येऊ न देणे ही चूक होती. हे लाखांचे मोर्चे वर्गीय प्रश्‍नाबद्दल न बोलता जातीय प्रश्‍नाबद्दल बोलत आहेत. अशावेळी जातीय अस्मिता टोकदार होणार असतील तर जातीअंताची संधी दवडली जाणार आहे.’
मूठभरांच्या हातात राज्याची सत्ता, सहकारी सत्ता का गेली. शिक्षणाचे बाजारीकरण कोणी केले. हे प्रश्‍नही मोर्चोकर्‍यांनी विचारले पाहिजेत.
प्रा. प्रकाश पवार म्हणाले, ‘प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याची मराठा समाजाची प्रक्रिया 1990 पासून सुरू झाली. आता मोर्चा मोठा झाला असला तरी, अजेंडा छोटा झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्यसंस्था द्विधा आहे. ‘कार्पोरेट स्टेटच्या उदयामुळे कृषी उद्योग संकटात आले. कौशल्याधारित प्रगती मराठा समाज करू शकला नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.’
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अहिंसक मोर्चाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘आर्थिक विकासाची मॉडेल्स अपयशी झाली. आता माणसा-माणसातील अंतर कमी करणारी क्रांती झाली पाहिजे. 31 घराण्यात एकवटलेली सत्ता, हे पाप नाही का? या पार्श्‍वभूमीवर मोर्चातून घडणार्‍या विचारमंथनातून अमृत बाहेर आले पाहिजे.’
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, अप्पा अनारसे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...