पुजारी यांच्या कविता मनाचा व नात्यांचा शोध घेणाऱ्या -शेखर गायकवाड

Date:


निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‌‘खोल मनाच्या तळाशी‌’ कवितासंग्रहाचे प्रका

पुणे : “सरकारी नोकरी दीर्घकाळ करूनही ज्यांनी संवेदनशीलता जपली आहे, असे वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या कविता म्हणजे मनाचा व नात्यांचा शोध घेणाऱ्या आहेत”, असे उद्गार यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि लेखक शेखर गायकवाड यांनी येथे काढले.

निमित्त होते निवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या ‌‘खोल मनाच्या तळाशी‌’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचे. गायकवाड यांच्यासह बालभारतीचे संचालक डॉ. कृष्णकुमार पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन वनभवन, गोखलेनगर येथील सभागृहात झाले. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील, कवी रामदास पुजारी, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे, पुजारी यांच्या परिवारातील सदस्य व्यासपीठावर होते. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे व कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन. आर. प्रवीण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शेखर गायकवाड म्हणाले, पुजारी यांनी वनविभागातील सरकारी नोकरी करत असताना कवितासंग्रहांचे प्रकाशन करून सरकारी विभागातील रूक्षता स्वतःमध्ये येऊ दिली नाही. गणितासारखा विषय, वनविभागातील जबाबदारी, फिरत्या स्वीकारूनही त्यांनी संवेदनशीलता जपली आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या अनेकांनी लिहिते राहिले पाहिजे आणि वेगळे अनुभवविश्व मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे माझे सांगणे आहे. पुजारी यांनी कवितासंग्रहाचे प्रकाशन करून ते सिद्ध केले आहे, हे उल्लेखनीय आहे.

डॉ. कृष्णकुमार पाटील म्हणाले, बालभारती प्रत्येक घरातला घटक आहे. पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार आणि वाचन आदर्श उभे करण्याचा प्रयत्न अभ्यासमंडळे करत असतात. पुजारी यांच्या कवितेतही संस्कार करण्याचे सामर्थ्य दिसते.

डॉ. शेषराव पाटील म्हणाले, पुजारी यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे कष्ट मांडले आहेत. तसेच नात्यांविषयी भाष्य केले आहे. त्यांचे भावविश्व उलगडणाऱ्या या कविता आहेत.

पुजारी यांनी निवृत्त झाल्यावर न थांबता दुसरी खेळी जणु सुरू केली आहे. त्यांच्यातील शिक्षक पुन्हा कार्यरत झाला आहे आणि कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवीही लिहिता झाला आहे, हे विशेष वाटते. त्यांनी यापुढेही लिहीत राहावे, अशा शब्दांत एन. आर. प्रवीण यांनी अध्यक्षीय समारोप केला.

मनोगत मांडताना कवी रामदास पुजारी यांनी आपली जडणघडण, संस्कार करणारे गुरूजन, कुटुंबीय, स्नेही आणि संघर्षाचे दिवस उलगडले. आई, वडील, गुरू हे श्रद्धेचे तर शेतकरी, निसर्ग, वृक्ष हे सारे जिव्हाळ्याचे विषय आहेत. नात्यांविषयीचे कुतूहल जागे असल्याने नात्याविषय़ीच्या कविता लिहिल्या गेल्या तर काही कविता प्रसंगानुरूप सुचत गेल्या, असे ते म्हणाले.
साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे यांनी आभार मानले तर अनिता देशपांडे व सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...