Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जमिनीची पत सुधारण्याकरिता गो आधारित शेती गरजेची : गोपाल सुतारिया

Date:

राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन आणि प्रशिक्षण नियोजन बैठक संपन्न ; महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने आयोजन
पुणे : देशी गोवंश वाचला, तर शेतकरी वाचेल आणि तरच देश वाचेल. रासायनिक खते किंवा कीटक नियंत्रक यांच्यापेक्षा अधिक गुणवत्तापूर्वक उत्पादन देशी गो वंश आधारित नैसर्गिक शेती मधून येते. गरज आहे ती याविषयी डोळसपणे प्रयत्न करण्याची. शेती वरील वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी, जमिनीची पत सुधारण्यासाठी आज लाखो शेतकरी यांनी गोकृपामृत वापरून शेती पर्यायाचा वापर केला आहे, असे बन्सी गीर गो शाळेचे प्रमुख गोपाल सुतारिया यांनी सांगितले. 

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षक चिंतन व महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण नियोजन बैठकीचे आयोजन पशुसंवर्धन आयुक्तालय येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशु संवर्धन विभागाचे आयुक्त डॉ प्रवीणकुमार देवरे, राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्राचे मुख्य संयोजक विजय वरुडकर, गोसेवा आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा पुंडलिक, गोसेवा आयोग सदस्य उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, मनीष वर्मा, गो कृषी तज्ञ तात्या मगर,ज्योत्स्ना वरुडकर, संजय भोसले, डॉ नितिन मार्कंडय, सनत गुप्ता आदी उपस्थित होते.

गो सेवा आयोग माध्यमातून गोमाता आधारित अशा १० वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रात काम सुरु आहे. गो आधारित शेती व गोपालन हे त्यातील महत्वाचे विषय आहेत. जमिनीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, ती सुधाकरण्याकरिता गो आधारित शेती करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले.

विजय वरुडकर म्हणाले, गो आधारित शेती किंवा नैसर्गिक शेती प्रशिक्षण, रासायनिक शेती आणि देशी गोवंश आधारित शेती याचा तुलनात्मक अभ्यास प्रशिक्षण, कामधेनु कृषी तंत्र, गोआधारित शेतीमधील विविध पद्धती, महाराष्ट्र गोहत्या बंदी अधिनियम माहिती यांसह गो आधारित कृषीतून सर्वांगीण ग्रामविकास, देशी गो वंशाचे नैसर्गिक शेतीतील आवश्यकता व महत्त्व गो आधारित शेतीतील यशोगाथा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील अनेक तालुक्यात नैसर्गिक शेती प्रशिक्षण नियोजन करण्यात येणार आहे. गो सेवा आयोग माध्यमातून डॉ. सुनील सूर्यवंशी जिल्हा निहाय गोशाळा यांचे प्रशिक्षण व नैसर्गिक शेती उत्पादन प्रशिक्षण विषयी आयोग सदस्य उद्धव नेरकर व विजय वरूडकर हे तालुका निहाय प्रशिक्षण सत्रांचे नियोजन करीत आहेत. या कार्यशाळा नोंदणी साठी ८४४६००४५८० या क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक समिती द्वारे करण्यात आले आहे. सारिका शेठ, संतोष  सुरवसे,  पौर्णिमा इनामदार, राहुल जगताप, विशाल वरूडकर, विक्रमादित्य शिंदे, गौरी शिलोनीकर, यांनी कार्यक्रम व्यवस्थापन केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय प्रश्न सभागृहात मांडले – आ. अमित गोरखे

तालिका सभापती पदाचा सन्मान जीवनातील सर्वोच्च आनंद - आ....

ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल:डॉ. अविनाश धर्माधिकारी

‘श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे...

राज ठाकरेंसोबत जाणाऱ्यांचे राजकारण संपेल, मराठी मुद्द्यावरुन अभिनेता भाजप खासदार मनोज तिवारीचा इशारा

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा...