मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून तो आवाजी मताने मंजूर करण्यात आला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यामुळे या ठरावावर कोणताच विरोध होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी 105 आमदारांनी शपथ घेतली. अनेक आमदारांनी 7 डिसेंबरला ईव्हीएमच्या मुद्द्यावर शपथ घेण्यास नकार देत सभागृहातून वॉकआउट केले होते, त्यानंतर शपथविधी थांबवण्यात आला होता. आजही काही सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच अध्यक्षांची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भाजप आमदार राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.