मुंबई- तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड, कर्नाटकात मतदान झाले. लोकसभेत झाले. प्रियांका गांधीही पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. जेव्हा आपला पराभव होतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे. जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागत नाही. हा दुटप्पीपणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाही. काम करणाऱ्यांना, फिल्डवर असणाऱ्यांना मतदान करतात. लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले. विरोधीपक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. मी म्हणालो होतो विरोधकांना लाडक्या बहिणी चार महिन्यात चीत करेल आणि तसेच झाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका जनतेने आमचं अडीच वर्षाचं काम पाहिलं. मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण केले. लाडक्या बहिणीपासून अनेक योजना केल्या. त्याची पोचपावती मिळाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला 73 लाख 67 हजार 673 मते मिळाली. आणि एनसीपीला 58 लाख 51 हजार 166 मते मिळाली. आम्हाला 73 लाख आणि एनसीपीला 58 लाख मते मिळाली. आम्हाला मिळाल्या 7 जागा आणि एनसीपीला मिळाल्या 8 जागा. मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा माझा सवाल आहे.