मुंबई-महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आजच्या दिवशी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आमदारकीची शपथ घेतली नाही . EVM च्या मुद्द्यावर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली आणि सत्ताधारी अन्य आमदारांचाही शपथविधी पार पडतो आहे .
EVM मुद्द्यावर विरोधी आमदारांनी शपथ न घेता सभात्याग केला ;आज ईव्हीएमचा मुद्दा मांडणार आणि नंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवून शपथ घेण्याबाबतचा निर्णय घेतील .प्रथम नाना पटोलेंनी शपथ घेतली नाही त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांचा सभात्याग केला .महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराष्ट्र विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कालच शपथ घेतली. नऊ वेळा आमदार राहिलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात शपथ दिली. आता कोळंबकर हे सर्व आमदारांना विधानभवनात शपथ देत आहेत.

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे,अजित पवार यांनी आपल्या काही समर्थकांच्या सह विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. राज्यात नव्याने स्थापन झालेले महायुतीचे सरकार शिवछत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार करेल असा दृढसंकल्प यावेळी केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा जयजयकार करत विजयाचा जल्लोष केला.
