Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“कर नाही त्याला डर कशाला”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल!

Date:

पुणे-

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर विरोधकांवर थेट हल्लबोल केला आहे.

“महायुतीचा सरकारी येत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं म्हणता येईल इतकं घवघवीत यश आम्हाला जनतेने दिलंय. मा. माजी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते यांनी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शेकडो हजार कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याचं आम्हाला यश मिळालं. मी तर याचं पहिलं श्रेय देवाला देते. कारण आमची प्रार्थना होती की महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा रथ चाललेला आहे त्याला आडकाठी येईल अशा कुठल्याही घटना घडू नये यादृष्टीने लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही भरपूर काम केलं.

विशेष म्हणजे शिवसेनेला पूर्वी 63 जागा मिळाल्या होत्या पण त्याच्यातही मूळच्या शिवसेनेच्या 56 जागा होत्या आणि आता आमच्या मूळच्या शिवसेनेच्या 57 जागा विधानसभेला निवडून आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मनामध्ये समाधान आहे पण यामध्ये महायुतीचे अतिशय चांगले आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे काम चांगलं होऊ शकेल आणि कुठल्याही प्रकारे अडसर येण्यापेक्षा सकारात्मक भूमिका राहील”, असं डॉ. नीलम गोऱ्हे स्पष्ट शब्दात म्हणाल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल! नेमकं काय म्हणाल्या?

विरोधकांकडून प्रचारादरम्यान वारंवार एक टीका केली जात होती की, आमचे सरकार आल्यावर महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकू पण आता विरोधकांची ही इच्छा अपूर्ण राहिली असा प्रश्न विचारला असता यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “एक शब्द आहे, कर नाही त्याला डर कशाला त्यामुळे आम्ही काही कर चुकवलेला नाहीये आणि काही केलेलंही नाहीये परंतु समोरच्याचा अपराध म्हणजे मतभेद असणं, अशीच भूमिका काँग्रेसची पण आहे कारण त्यांनी आणीबाणी लादली होती. आज त्यांनी कसे योग्य ते नॉर्म्स टाकले याच्यावर काही वृत्तपत्रात लोक बोलतात पण मुळामध्ये त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली, त्यांच्या राज्यपालांची, त्यांच्या भूमिकांची तर महिला आरक्षण विधेयकसुद्धा त्यांनी लोंबकळत ठेवलं. तलाक पीडित महिलांना न्यायसुद्धा दिला नाही.

दुसरीकडे आज आम्ही पाहतो की अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतात त्यांच्यापैकी अनेकांची भूमिका होती की, आमचं सरकार आल्यावर आम्ही तुरुंगात टाकू, पण तुरूंगात कशाबद्दल टाकणार आहात? तुमच्याशी मतभेद म्हणजे हे तुरूंगात टाकण्याचं कारण होऊ शकत नाही. देशद्रोह, शांतता सुव्यवस्था बिघडवणं असं काय केलं होतं आम्ही की, ज्याबद्दल सारखं असं बोललं जातं होतं आणि यामुळेच मला वाटतं ज्याची पाठी त्याच्या काठी”, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान पुणे : पुराण...