Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आकांक्षा नव्या युगाच्या पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

Date:

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दर दोन वर्षांनी बदल घडत आहेत. तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून डॉ. संजय गांधी यांनी लिहिलेले आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित आकांक्षा नव्या युगाच्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री दादा इदाते, डी. आय. सी. सी.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, आय. आय. आय. टी. अलाहाबादचे संचालक प्रा. मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे अशुतोष रामगिर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुस्तकाचे शब्दांकनकर्ते प्रसाद मिरासदार, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सच्या संचालक समीधा गांधी, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे मंचावर होते.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, डॉ. संजय गांधी यांनी विकासाची त्रिसूत्री मांडताना शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा आढावा पुस्तकामार्फत युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्ननिर्मितीवर भर देताना डॉ. संजय गांधी यांनी पाच आरची तत्त्वे मांडली आहेत, ज्यात रिड्युस, रियुज, रिफ्यूज, रिपेअर आणि रिसायकल यांचा विचार केला आहे. त्या बरोबरीनेच आजच्या तांत्रिक युगात रिकॉन्फिगर या सहाव्या आरचाही समावेश व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुरुवातीस डॉ. संजय गांधी यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. युवा पिढीने रोजगारक्षम होऊन शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्यरत व्हावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे समीधा गांधी म्हणाल्या.
पद्मश्री दादा इदाते म्हणाले, नाविन्य, धडपड, येणाऱ्या पिढीविषयी आस्था, सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, रोजगार, उद्योजकता या विषयी समाजजीवनात नविन इतिहास घडविणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. संजय गांधी होत. आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक संभ्रमित युवा पिढीला, त्यांच्या स्पदंनांना साद घालणारे ठरेल.
पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, या पुस्तकाच्या निर्मितीने साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. हे साहित्य भविष्याचे वेध घेणारे आहे. युवा पिढीच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांना जागृत करणारी त्रिसूत्रीची मांडणी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रसाद मिरासदार यांनी पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली. युवा पिढीने या प्रेरणादायी पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संजय गांधी, समीधा गांधी, सुनील महाजन यांनी केले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत हुनर गुरुकुल, असीम फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन तसेच रिलायन्स ग्रुपचा सन्मान पद्मश्री दादा इदाते आणि पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार निकिता मोघे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...