शिवरायांचे गड-कोटांचे प्रशासन उल्लेखनीय

Date:

पुणे : भारतीय लोक शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर जर गेले तर त्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्याशी लढतील आणि ती प्रेरणा त्यांना मिळू नये या उद्देशाने ब्रिटिशांनी भारतीयांना तिथे जाऊ दिले नाही. यामुळेच शिवाजी महाराजांच्या गड कोटांची दुरवस्था झाली असे मत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी आज ( २८.१०.२०२४ ) व्यक्त केले. दिवाळीनिमित्त माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात गड-किल्ले बांधणी स्पर्धेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ” छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटांचे प्रशासन ” या विषयावर ते बोलत होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सागरी आरमाराची निर्मिती आजच्या वसुबारसदिवशी केली असल्याच्या अनुषंगाने प्रशालेत गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विविध प्रकारच्या गायी आणि त्यांचे होणारे उपयोग याबद्दल माहिती दिली.
एकावेळेला 300 लोक जाऊ शकतील आणि 300 टन साहित्य वाहून नेता येईल अशी जहाजे मराठ्यांनी निर्माण केली होती. यामुळेच सागरी मार्गाने व्यापार सुरू झाला आणि स्वराज्याची भरभराट होऊ शकली असल्याचं थोरात यावेळी म्हणाले. महाराजांनी गड किल्ल्यांचे प्रशासन उत्तम राखल्यानेच महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे लढू शकले अशीही माहिती थोरात यांनी यावेळी दिली.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या सागरी आरमाराची निर्मिती वसुबारसदिवशी केली असल्याची माहितीदेखील थोरात यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने प्रशालेतील सर्व शिक्षिका , शिक्षकेतर महिला कर्मचारी यांच्या हस्ते गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी विविध प्रकारच्या गायी आणि त्यांचे होणारे उपयोग याबद्दल माहिती दिली.

तत्पूर्वी दीप्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याचवेळी डॉ सुशीलकुमार धनमने आणि अनंतप्रसाद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचे परीक्षण केले. राजगड , प्रतापगड आणि तोरणा या प्रतिकृतींना अनुक्रमे प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंतीताई यांनी परिक्षकांचा परिचय करून दिला. विकास दिग्रसकर यांनी सुत्रसंचलन केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...