Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? -माजी आमदार मोहन जोशी

Date:

पुणे – रेल्वे तिकीट आरक्षणाचा (बुकिंग) कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीचा नसून एजंटांच्या फायद्याचा आणि सरकारच्या नफेखोरीसाठी घेतलेला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

रेल्वे प्रवासाचे तिकीट बुकिंग १२० दिवस अगोदर करण्याची मुभा होती. तीर्थयात्रा, सहली, मंगलकार्य अशासाठी सामान्य प्रवासी १२० दिवस आधीच बुकिंग करून ठेवत असे. याचा फायदा त्यांना सवलत मिळविण्यासाठी आणि दीर्घ प्रवासाचे नियोजन करण्यासाठी होत असे. ही सवय लोकांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचानकपणे बुकिंग चा कालावधी१२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला. मध्यमवर्गीय प्रवासी यामुळे नाराज झाले आहेत. कालावधी कमी केल्याने सरकारला सवलती द्याव्या लागणार नाहीत, मोदी सरकारची नफेखोरी चालू रहाणार आहे आणि एजंटांचे फावणार आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयाचा निषेध करतो. रेल्वे खात्याचा कारभार सामान्य माणसासाठी सोयीचा न रहाता वैष्णव यांच्या काळात अव्यवहार्य आणि मनमानी राहिलेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत चालू ठेवा

वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत दिली जात होती. करोना साथीचे निमित्त करून मोदी सरकारने ती सवलत रद्द केली. ती सवलत अद्यापपर्यंत पुन्हा सुरू झालेली नाही. अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळत असलेली ही सवलत पुन्हा चालू करावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“त्या” विमान प्रवाश्यांना भरपाई दिलीच पाहिजे: मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत...

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...