मुंबई- लाडकी बहिण योजनेवर आज येथे राज ठाकरे यांनी घणाघात करताना म्हटले कि, कोणी मागितले होते पैसे ? महिलांना जर सक्षम बनवायचे असेल तर त्यांच्या हाताला काम द्या ,त्यांना मार्ग दाखवा , फुकट कसले पैसे देताय ?बेरोजगारांना , शेतकऱ्यांना काही ना काही फुकट द्या ,एका पक्षाने दिले कि दुसऱ्यांनाही ते द्यावे लागतात, फुकटाच्या सवयी लावताहेत… पगार द्यायला पैसे राहायचे नाहीत…. नागडा होणार आहे महाराष्ट्र ….
राज ठाकरेंनी जनतेलाही सवाल केला , तुम्हाला चांगला ,सरळ, सभ्य माणसे काआवडत नाही ? नक्की तुम्हाला आवडतंय काय ? देशाच्या प्रगतीचा विचार करा चांगला माणूस हवाय कि नाही ते ठरवा , आज जर तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद च झाला म्हणून समजा बरबाद
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारांनी महाराष्ट्र निर्माण सेनेवर विश्वास दाखवावा, त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हे हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवून दाखवावा, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. या महाराष्ट्राचे धुरा माझ्या हातामध्ये द्या, अशी विनंती देखील राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. कारण हा केवळ मराठा समाजाचा विषय नाही. तर या देशांमध्ये जेवढी राज्ये आहेत, त्या प्रत्येक राज्यातील विविध समाजाचा हा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आरक्षणाची मागणी कोणताच पक्ष पूर्ण करू शकत नाही, असा दावा देखील त्यांनी केला. एका राज्यात एका समाजाला आरक्षण दिले तर सर्वच राज्यातील इतर समाज देखील पेटून उठतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र कोणत्याही समाज हाताला काम असल्याशिवाय राहू नये, ही माझी भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राज ठाकरे स्पष्ट बोलतो, त्यामुळेच मी दिसतो. ते इतरांना नको वाटते, असे देखील त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हा विषय पुन्हा निघणार नाही. पुढील वेळेस जेव्हा पुन्हा निवडणुका येतील त्यानंतरच या विषयाचे वारे वाहू लागतील, असा दावा देखील त्यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत देखील युती सोबत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा सुरू केली होती. त्यातच त्यांनी 200 पेक्षा जास्त विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा देखील केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती किंवा महाआघाडीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. आता मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.