पुणे- खडकवासला विधानसभा मतदार संघ तसा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मतदार संघ.बारामती लोकसभा मतदार संघात येणारा हा मतदार संघ गेली तेरा वर्षे भाजपने आपल्याकडे राखून ठेवण्यात यश मिळविले आहे.ते कोणत्या कर्तुत्वाच्या जोरावर हेच अनेकांना न उलगडणारे कोडे आहे. त्याचे उत्तर स्पष्ट आहे येथे भाजपला मानणारा आणि विस्थापित होऊन या मतदार संघातला रहिवासी झालेला मतदार संघ मोठा आहे. गावकी भावकीच्या लढाया पाहत अनधिकृत बांधकामाच्या जाळ्यात,वाहतुकीच्या कोंडीत आणि अस्वच्छतेच्या परिसरातच वावरलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीच्या काका पुतण्यांनी कॉंग्रेसला कधीच हद्दपार केले हा इतिहास मतदार देखील जाणून आहेच.पण बेकायदेशीर बांधकामे करत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या किंवा खंडणीखोर आणि गुन्हेगारांच्या छायेत राहण्या ऐवजी येथील मतदार संघाला शांतता प्रिय आणि विकासाकडे नेणाऱ्या नेतृत्वाची कायमच गरज भासली.या पार्श्वभूमीवर सध्याचा काळ पहिला तर गुन्हेगारी,घात पात अपघात, अनधिकृत बांधकामांनी निर्माण झालेले प्रश्न आणि वर्चस्वाधीष्टीत गुन्हेगारी यामुळे येथील नागरिक चिंतातूर बनलेला आहे.चिखलांचे रस्ते,पाण्याची कमतरता, ड्रेनेजच्या समस्या,विजेचा अभाव,डुकरांचा सुळसुळाट या सर्व स्थानिक समस्यांना आता पत्रकारांनी,आणि महापालिकेत पोहोचलेल्या या मतदार संघातील सदस्यांनी जवळ जवळ पूर्णपणे तिलांजली दिली आहे. या मतदार संघात मग १३ वर्षे आमदार राहून काय करता आले असते ? आणि काय करायला हवे होते ?यावर मंथन करत आता विद्यमान आमदारांना मतदारच घेरणार आहेत अशी स्थिती आहे.गेल्या निवडणुकीत एका व्हिडीओ ने धमाल केली.आणि बिल्डरशाही जोपासणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे पारडे जड केले. पण विजय मात्र राष्ट्रवादीला मिळविता आला नाही.आणि भाजपाला हातातून निसटू पाहणारा हा मतदार संघ म्हणूनच याकडे पाहावे लागू लागले, पण तरीही गेल्या ५ वर्षात देखील महापालिकेच्या स्तरावरच येथे काम होत गेले. राज्यस्तरावरील कामासाठी देखील महापालिकेलाच वारंवार पाठपुरावा करण्याचे नशिबी आले.या पार्श्वभूमीवर भाजपने आता या विधानसभेला आपला उमेदवार येथून बदलला तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.खडकवासल्यातून राष्ट्रवादीची २ शकले झाल्या नंतर भाजपाला योग्य तळमळीचा,जनसंपर्क दांडगा ठेवलेला उमेदवार दिला तर विजय अवघड नाही असे मानले जाते. आणि म्हणूनच येथून कितीही उमेदवार इच्छुक असले तरी महिला उमेदवार म्हणून आणि काम करण्याची प्रबळ इछ्या शक्ती गेल्या ५ वर्षात दिसलेल्या मंजुषा नागपुरेंचे नाव सूत्रांनी आघाडीवर नोंदविले आहे. ज्या नावास हिंदुत्वाची किनार देखील लाभलेली असल्याने संघाकडून देखील या नावाची शिफारस होऊ शकते असाही दावा केला जातो आहे.
रस्त्याचे रुंदीकरण अगोदर आणि नंतर उड्डाण पुले,ड्रेनेजच्या समस्या सोडविणे अशा कामांना प्राधान्य देत बेरोजगारी,ज्येष्ठांची काळजी, महिलांचे संरक्षण अशा कामांची यादी नागपुरे यांचे नाव आघाडीवर ठेवण्यास कारणीभूत ठरते आहे. त्यांच्या शिवाय अन्य काही इच्छुक आहेत पण त्यांना महापालिकेच्या स्तरावरच आपले राजकारण सुरु ठेवावे लागेल असा सूत्रांचा दावा आहे त्यामुळे आता खडकवासल्याच्या उमेदवारीसाठी तब्बल १३ वर्षे आमदार राहिलेल्या तापकिरांना पक्षांतर्गत पातळीवरच संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते आहेत नेमके आता त्यात त्यांना यश मिळणार कि निवृत्तीच स्वीकारावी लागणार हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे हे निश्चित.

