Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रतन टाटा पंचत्वात विलीन:अंत्यसंस्कारापूर्वी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला

Date:

“मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा”; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील ‘त्या’ प्लांटमध्ये आजही काम सुरूच

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते आणि त्यांना वयोमानानुसारचे आजार होते.टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे ठेवण्यात आले होते. येथून त्यांची शेवटची यात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहोचली. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह राजकारण, क्रीडा आणि व्यवसायातील अनेक व्यक्तींनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, एक युग संपले आहे

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गुरुवारी रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. मंत्रिमंडळाने आपला प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. मंत्रिमंडळाने म्हटले की, देशाने एक महान समाजसेवक, दूरदर्शी आणि देशभक्त नेता गमावला आहे.

अमित शहा म्हणाले की, मी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो, रतन टाटाजींशी माझी वैयक्तिक ओळख राहिली आहे, पण ते भारतीय आणि जागतिक उद्योगात मोठे नाव होते. टाटा समूहाचे नेतृत्व करणे ही एक मोठी गोष्ट आहे. अनेक बदल करणे आवश्यक असताना त्यांनी टाटा समूहाचे नेतृत्व हाती घेतले. अत्यंत संयमाने, अचूकतेने आणि अभ्यासाने त्यांनी टाटा समूहाचे उद्योग आणि त्यांची कार्यपद्धती बदलून टाकली.

टाटा समूह हा भारतीय उद्योगक्षेत्रातील एका ध्रुव ताऱ्यासारखा आहे, त्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. आपल्या उद्योगाचा सचोटीने विकास करणे, देशाच्या सर्व नियमांचे पालन करून आपला उद्योग प्रमुख स्थानावर ठेवणे आणि आपल्या विश्वासाच्या माध्यमातून देशाच्या समस्या सोडवणे, याला टाटा समूहाने खूप महत्त्व दिले आहे चांगले केले आहे. रतन टाटाजी आज नसले तरी त्यांनी सोडलेला वारसा देशाच्या उद्योगासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.

रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीमधील स्मशानभूमीमध्ये विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पारंपारिक दख्माऐवजी (dakhma) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीमध्ये आजही काम सुरु : रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. पण, पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीमध्ये आजही काम सुरु ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज पुण्यातील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांच्या आठवणी सांगितल्या, यावेळी कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही चालू ठेवण्या मागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये आजही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. कारण, ‘मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वतः टाटांनी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं आणि आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आजही काम करतोय, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना कामगारांना अश्रू अनावर झाले.

पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्स युनिटमधील कामगारांनी उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती, याची आठवणही कर्मचाऱ्यांनी काढली. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी बोलताना कर्मचारी म्हमाले, टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड येथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...