पुणे-सन 2016 मध्ये मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन त्यांनी अरबी समुद्रात महाराज यांचे स्मारक भूमिपूजन केले होते. महाराज यांचे स्मारक खरेच निर्माण झाले की नाही याची पाहणी 7 ऑक्टोबर रोजी करण्याचे आम्ही ठरवले आहे. कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केल्याचे सांगितले आहे. मात्र, याची धास्ती सरकारने घेऊन आमचे सर्व बोर्ड जे कायदेशीर होते ते काढले. जिथे रीतसर बोट बुकिंग केले त्यांना देखील धमकावले आहे. बोट परवानगी रद्द करू असे सांगण्यात आले आहे. ही भाजपची मोगलशाही आहे. या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. भाजपची दडपशाही राज्यात सुरु असून ते मनमानी कारभार करत आहे. कायदा मोडून आम्ही काही करत नसून आमचा तो अधिकार आहे. आम्हाला अडवले तर त्यास सरकार जबाबदार आहे, असा इशारा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, 100 बोटी आम्ही बुकिंग केल्या होत्या त्यापैकी केवळ 50 बोटी आतापर्यंत कन्फर्म करण्यात आल्या आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी भाजप मते मिळवण्यासाठी धडपड केली जात आहे. पंतप्रधान स्वतः कार्यक्रमास येत असतात त्यावेळी सर्व परवानगी घेतलेल्या असतात पण त्या 75 टक्केच घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस फोन करून धमक्या देतात ही हुकुमशाही आहे. आम्हाला घटनेने जो अधिकार दिला त्याबाबत जाब विचारत आहे. गड किल्ले दुरुस्ती याकडे सरकार लक्ष्य देत नाही. अरबी समुद्रात जर स्मारक करणे पर्यावरण दृष्ट्या योग्य नव्हते तर ते कशासाठी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला आहे.
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
11 ऑक्टोबर रोजी पुण्यात महारष्ट्र स्वराज पक्ष उद्घाटनचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. आगामी निवडणूक अनुषंगाने जे अस्वस्थ लोक आहे ते इच्छा व्यक्त करत आहे. जे विस्थापित आहे त्यांना तिकीट देण्यास आमचे प्राधान्य आहे. शरद पवार यांची भूमिका आरक्षण बाबत कशा पद्धतीने सांगतात मला माहित नाही. ते जेष्ठ नेते असून त्यांना माझी टिंगल करणे अधिकार आहे. जे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले ते समाजाला मान्य नाही. ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी आहे. समाजात अस्वस्थता आहे. जातनिह्या जनगणना झाली पाहिजे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यांनी निवडणुकीत पाडापाडी राजकारण करण्यापेक्षा उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवावे, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

