पुणे-राज्यात राेज महिलांवर बलात्कार, विनयभंग, अत्याचार घटना घडतात. त्यातून वर्दीची भीती राहिली नसल्याचे दिसून येते. पाेलिस यंत्रणेचे नेतृत्व याला जबाबदार असून या प्रकरणी गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली
महिला अत्याचाराच्या घटना राेखण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना हाेताता दिसत नाही. वेळेत गुन्हा दाखल करुन फास्टट्रक न्यायालयात केस चालवून भर चाैकात दाेषीला फाशीची शिक्षा द्या ही सातत्याने मागणी आम्ही करतो. पण हे सरकार एन्काउंटर करुन पाेस्टरबाजी करते. हे गलिच्छ राजकारण आहे. एखाद्या मुलीवर अत्याचार हाेताे व त्यावर घाणरेडे राजकारण होते हे चुकीचे आहे, त्या म्हणाल्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपण पोलिसांच्या वर्दीचा मान, सन्मान राखतो. देशात सर्वात चांगले पाेलिस हे महाराष्ट्रात आहेत. परंतु आज या यंत्रणेला काय नेमके झाले आहे? त्याचे मूळ कारण मंत्रालय हे आहे. पाेर्श सारखी कार भरधाव वेगात येते व एखाद्यास उडून जाते, आराेपींचे रक्ताचे नमुने बदलले जातात, महिला अत्याचार घडतात, ससून रुग्णालयातून ड्रग डिलर गायब हाेताे या गाेष्टी महाराष्ट्राला न शाेभणाऱ्या आहेत. एन्काउंटर करुन प्रश्न सुटत नाहीत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा हाेत्या. परंतु गृहमंत्री यांचे बंदूक हातात घेतलेले पाेस्टर राज्यात लागत असतील तर ही बाब याेग्य नाही.राज्य सरकार महिला सुरक्षेवर अपयशीसद्यस्थितीत एक नागरिक व लाेकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. बदलापूरची घटना ही काही टीव्हीवरील मिर्झापूर सारखी मालिका नाही. ते वास्तव आहे. राज्याच्या व देशाच्या लेकी बद्दल पाेस्टरबाजी करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. एखाद्या मुलीवर अत्याचार हाेताे व त्यावर घाणरेडे राजकारण करणे चुकीचे आहे. एकमेकांविराेधात पाेस्टरबाजी करुन क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जाताे. हे दुर्देवी आहे. ट्रिपल इंजिन सरकारचा मी जाहीर निषेध करते. महिला सुरक्षा बाबत राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.हर्षवर्धन पाटील कुटुंबाशी कौटुंबिक संबंधमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमचे कुटुंबाचे सहा दशकांपासून काैटुंबिक संबंध आहेत. ते भाजपात असताना देखील ते संबंध आम्ही जपले. भाऊ आज पुन्हा घरी येतात त्याचा आम्हाला आनंद व समाधान वाटले. काही कारणामुळे मध्यंतरी दुरावा आला पण ताे राजकीय दुरावा हाेता. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या मनात नेहमीच प्रेम व आदर भावना आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.