पुणे, दि. १४: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, दूर्गम भागातील नागरिकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना आकर्षक एलईडी रथाद्वारे पोहोचविण्यात येत असून ही यात्रा दुर्गम भागातील पाड्यापर्यंत पोहोचत असल्याने अनेक आदिवासी बांधवांना याचा लाभ झाला.
या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना सिकलसेल, ॲनिमिया निर्मूलन मोहिम, एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये नावनोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क नियम: वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन, वन धन विकास केंद्र, १५ नोव्हेंबर आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करणे, पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी असलेली स्वदेश दर्शन योजना, हागणदारी मुक्…