राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 15 जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान

Date:


महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील आशा वामनराव बावणे फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2024 ने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना  वर्ष  2024 साठीचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  अनुप्रिया पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण 15 परिचारिकांना   समाजाप्रति त्यांच्या उल्लेखनीय कर्तव्यनिष्ठेबद्दल सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सार्वजनिक आरोग्य परिचारिका आशा वामनराव बावणे  या वर्ष 2024 च्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी एक आहेत. आशा बावणे या चंद्रपूर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत असून या सेवेत  त्यांचा 28 वर्षांचा अनुभव असून यापैकी  20 वर्षे त्यांनी आदिवासी भागात काम केले आहे. अनेक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून अनेक CNE कार्यक्रमांना देखील त्या उपस्थित राहिल्या आहेत. विशेषत: कोविडच्या काळात लसीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अतिसाराच्या प्रादुर्भावादरम्यान तसेच प्रामुख्याने  हज यात्रेकरुंच्या लसीकरणाशी संबंधित त्यांनी केलेल्या कार्याचे  प्रशस्तीपत्रात कौतुक करण्यात आले आहे.

परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून 1973 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची स्थापना केली.

नोंदणीकृत सहाय्यक परिचारिका आणि दाई , नोंदणीकृत परिचारिका आणि दाई आणि नोंदणीकृत महिला अभ्यागत या श्रेणीमध्ये एकूण 15 पुरस्कार देण्यात आले. केंद्र, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत उत्कृष्ट नर्सिंग कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. रूग्णालय किंवा समुदाय संस्था शैक्षणिक किंवा प्रशासकीय संस्थांमध्ये  नियमित नोकरीत  असलेली परिचारिका राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र आहे. प्रशस्तीपत्र , 1,00,000/- रुपये रोख आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या  देशभरातील अन्य परिचारिका खालीलप्रमाणे आहेत:

S. NoCategoryStateName
1ANMAndaman & Nicobar IslandsMs Sheela Mondal
2ANMArunachal PradeshMs Iken Lollen
3ANMPuducherryMs Vidjeyacoumary V
4ANMSikkimMs Januka Pandey
5ANMWest BengalMs Anindita Pramanik
6LHVManipurMs Brahmacharimayum Amusana Devi
7NurseDelhiMajor Gen Ignatius Delos Flora
8NurseDelhiMs Prem Rose Suri
9NurseJammu & KashmirDr Tabasum Irshad Handoo
10NurseKarnatakaDr Nagarajaiah
11NurseLakshadweepMs Shamshad Beegum A
12NurseMaharashtraMs Asha Womanrao Bawane
13NurseMizoramMs H Mankimi
14NurseOdishaMs Sanjunta Sethi
15NurseRajasthanMr Radhey Lal Sharma

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती...

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : गोपाळकृष्ण पिल्लई

सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान पुणे :  रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली. सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे  टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते. पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले. इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे.. सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो. जबाबदारी...

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14...

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...