पुणे-पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीला पूर आला. यामुळे नदी काठच्या असंख्य कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं लागलं.मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यातील पाऊस व खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून शाळा व महाविद्यालयांना आजच सुट्टी जाहीर करण्याची सूचना केली. उद्या ऐनवेळी अडचण नको. त्यामुळे आजच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा. यामुळे नागरिकांची सुविधा होईल, असे ते म्हणाले.
कोथरुड मधील रजपूत वीटभट्टी आणि खिल्लारे वाडी परिसराला ही पूराचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना तातडीने स्थलांतरित करण्याची आवश्यकता होती. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तातडीने नदी काठच्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन, त्यांची राहण्यासह जेवण आणि इतर आवश्यक वस्तूंची पुर्ताता करुन सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यतत्परतेवर कोथरुडची जनतेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यातील घाट माथ्यावर सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने ही सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडूनही मदत कार्य सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मदत कार्य करत आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अनेक भागात व्हिजिट केली आहे.पाणी साचलेल्या सोसायटयांमध्ये प्रशासन पाणी उपसण्याचे काम भर पावसात करत आहे.कुठेही काहीही मदत लागल्यास लगेच संपर्क करा असे आवाहन करत चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून राजपूत विटभट्टी, खिलारेवाडी परिसरात पूरग्रस्त नागरिकांना भोजन व्यवस्था करण्यात आली असून, भाजपा चे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वत्र तत्परतेने तक्रारीची दखल घेत आहेत .

