मतांच्या ध्रुवीकरणामुळे राजकीय पक्ष लोकसंख्येवर बोलत नाहीत-डॉ. आर. नागाराजन

Date:

एमआयटी डब्लूपीयूत लोकसंख्या नियंत्रण कार्यशाळा संपन्न

पुणे, १२ जुलै २०२४ : “देशात जन्मदर नियंत्रण कायदा नसल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. कुटुंब नियोजन उपक्रमांद्वारे जन्मदर नियंत्रण करता येऊ शकते. जगातील ३ डझन देशांनी जन्मदर नियंत्रण करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवले आहे. जन्मदर कमी झाल्यास देशातील नागरिकांना उत्तम दर्जाच्‍या प्राथमिक सुविधांचा लाभ मिळून देशाच्‍या सर्वांगिण विकासास चालना मिळेल.परंतू मतांच्या ध्रुवीकरणामुळे राजकीय पक्ष लोकसंख्येवर बोलत नाहीत “असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. आर. नागाराजन यांनी व्यक्त केले.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एमआयटी डब्लूपीयूच्या  स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स व मेकॅनिकल विभागाच्या वतीने आयोजित  लोकसंख्या नियंत्रण कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक  प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्लूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. मंदार लेले, डॉ. अंजली साने व डॉ. एस. बी. बर्वे  उपस्थित होते.
डॉ. आर. नागाराजन म्हणाले,” लोकसंख्यावाढ ही  देशासमोरील  सर्वात मोठी समस्या  आहे. या मुळे देशात संसाधनांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. जर या वर नियंत्रण करता आले नाही तर हा देश बेरोजगारांचा म्हणून गणल्‍या जाऊ शकते. मतांच्या ध्रुवीकरणामुळे राजकीय पक्ष लोकसंख्येवर बोलत नाहीत.मात्र लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती व रचनात्मक पातळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांना प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.”
 प्रा. प्रकाश  जोशी म्हणाले,” २०११ ते २०२१ या वर्षांमध्ये देशात १९ कोटींनी लोकसंख्या वाढली आहे. अशीच गती राहिल्‍यास पुढील पन्नास वर्षांत  २१६ कोटी एवढी लोकसंख्या होऊ शकते. देशात लोकसंख्येचा भस्मासुर झाला असून याला नियंत्रण करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणताही विभाग अस्तित्वात नाही. अशा विभागाची गरज असून लोकसंख्या नियंत्रणातूनच या देशाची समृद्धी वाढेल. देशातील लोकांच्या गुणवत्तापूर्ण दर्जात्मक चांगल्या सेवा सुविधांसाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव पर्याय आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी राजकीय इच्छाशक्ती, विवाहाचे वय, शिक्षणावरचा खर्च, साक्षरता, कुटुंब नियोजन प्रोत्साहन व प्रसार मध्यामांद्वारे जागरूकता यावर ही चर्चा होणे आवश्यक आहे.”
डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले,” देशातील बेकारी, घरांची कमतरता, वाहतुकीची कोंडी, पर्यावरणाचा विनाश, गुन्हेगारी या सर्वांच्या मुळाशी लोकसंख्यावाढ हेच कारण आहे. संख्या शास्त्राच्या मदतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी इकॉनॉमिक्स व कॉमर्स संशोधन विभाग विद्यापीठाच्या स्तरावर महत्वपूर्ण कार्य करतील.”
तसेच शिक्षणाचा लोकसंख्या नियंत्रणावर होणारा सकारात्मक परिणाम, एक अपत्य मातृत्व महत्त्व, दळणवळण, रोजगार, आरोग्य यांवर हाोणारे परिणाम व उपायांवर येथे चर्चा करण्यात आली.  
विद्यार्थिनी द्रिती जैन ने सूत्रसंचालन व डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...