पुणे–पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे रेट वाढवले त्याच्या निषेधार्थ गुडलक चौक, पुणे येथे निषेध आंदोलन करण्यात आले. ‘‘पहले किया महंगा आटा, अब किया महंगा डेटा’’, ‘‘मोबाईल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’ अशा प्रकारच्या घोषणा देत मोबाईल कंपन्या व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, मुख्तार शेख, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, प्रदेश सदस्य मेहबुब नदाफ,प्रा. यशराज पारखी, माजी नगरसेवक रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राजेंद्र शिरसाट, घनश्याम निम्हण, राजू ठोंबरे, अजित जाधव, रमेश सकट, हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, शिवा भोकरे, वैभव डांगमाळी, ॲड. संदिप ताम्हणकर, देवदास लोणकर, उषा राजगुरू, सुनिता नेमुर, शोभना पण्णीकर, सुरेखा काची, सुंदरा ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, आशितोष शिंदे, लतेंद्र भिंगारे, गेणश गुगळे आदींसह असंख्य काँग्रेस जण उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘मोबाईल रिचार्जचे दर हे २० ते ३५% ने वाढले आहेत. १५५ रूपयांना मिळणारे रिचार्ज आता १८९ रूपयांना मिळत आहे. तर ६६६ रूपयांना मिळणारे रिचार्ज आता ७९९ रूपयांना मिळत आहे. ज्यांचे पोट हातावर आहे, जे मोलमजुरी करतात त्यांना लोकेशन मिळविण्याठी, पत्ता मिळविण्यासाठी, व्हॉट्सअप डेटा हा अत्यंत गरजेचा झालेला आहे. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तींपासून सर्वांचे आर्थिक गणित हे बिघडणार आहे. आजकाल शिक्षणामध्ये सुध्दा लहान मुलांना यु ट्युब शैक्षणिक व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक घोषणा देऊन गॅस सिलेंडरचे रेट कमी करून जणू काही महागाई कमीच करणार आहे असे सर्वसामान्य नागरिकांना भासवून दिले. पण निवडुण आल्यावर मात्र नेहमी प्रमाणे जुमलेबाजी करीत धनधांडग्या उद्योजकांना साथ देत मोबाईल रिचार्जचे रेट वाढविले आहेत. या सर्व कंपन्यांनी सरकारला ईलेक्ट्रॉल बॉंडच्या रुपात करोडो रुपये देणगी दिली असल्याने सरकार काहीही कारवाई करणार नाही. महागाईने बेजार जनतेला यामुळे परत एकदा आर्थिक फटका बसणार आहे याचा आम्ही निषेध करतो.’’