पुणे- भाजप शहराध्यक्षांचा मर्डर होणार होता. त्यामुळेच ते संरक्षण घेऊन फिरत आहेत. त्यांची कर्मच अशी आहेत की, त्यांना त्यामुळेच संरक्षण घेऊन फिरावे लागते , असे विधान पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याविषयी केले आहे.भाजपच्या शहर अध्यक्षांनी लावलेल्या एका फलक मुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत . राहुल गांधी हे हिंदू धर्मविरोधी आहेत असे चित्र ,आणि वातावरण निर्मिती भाजपकडून होत असल्याने आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सटकू लागली आहे .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू हिंसक असल्याचे विधान केल्याचा ठपका ठेऊन गांधींचा भाजपकडून निषेध केला जात आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनीही शहरात विविध ठिकाणी बॅनर्स लावून राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करताना दिसत आहेत .अरविंद शिंदे आणि शहर कॉंग्रेस चे पदाधिकारी महिला मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन करत असताना काही पत्रकारांनी या बनर्सवर प्रतिक्रिया विचारल्यावर अरविंद शिंदे यांनी घाटे यांच्याविषयी हे विधान केले, ज्यास वादग्रस्त असे संबोधण्यात येऊ लागले आहे .
ते म्हणाले,’ हिंदू अहिंसा मानणारा आहे तो हिंसक असू शकत नाही असे राहुल गांधी आपल्या वक्तव्यातून सांगत असताना त्यांची विधाने फिरवून हिंदू हिंसक असल्याचे विधान केल्याचा ठपका त्यंच्या माथी मारून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागात राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचा फोटोही लावण्यात आला आहे. त्याखाली खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल, असे मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यावर अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे.
अरविंद शिंदे या प्रकरणी धीरज घाटे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, भाजपवाले हिंदू नाहीत हे राहुल गांधी यांना सांगायचे होते. पण कोणताही मुद्दा नसल्यामुळे भाजपवाले शब्दांची फिरवाफिरव करत नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता त्याला भीक घालणार नाही. ज्या भाजप शहराध्यक्षांनी शहरात हे बॅनर्स लावले, ते स्वतः पोलिस संरक्षण घेऊन फिरतात.कारण, त्यांचा मर्डर होणार होता. त्यांना शहरात एकट्याने फिरताही येत नाही. ते कधी मरतील हे माहितीही नाही. कारण, त्यांची कर्मच तशी आहेत. त्यांचे कर्म च अशी आहेत ज्यामुळे त्यांना संरक्षण घेऊन फिरावे लागते असे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.