जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीत आर्थिक सल्लागारांचे योगदान डॉ. प्रणाली खडसे-धांडे

Date:

पुणे : “वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीत दिवसेंदिवस अधिक सुलभता, सुसूत्रता येत आहे. ही प्रणाली अधिक सुलभ व्हावी, तसेच याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता करदात्यांसाठी आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौंटन्टस (सीएमए), सनदी लेखापाल व टॅक्स प्रॅक्टीशनर्स यांचे योगदान मोलाचे आहे,” असे मत राज्य कर उपायुक्त डॉ. प्रणाली खडसे-धांडे यांनी व्यक्त केले.
दी इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) पुणे चॅप्टरतर्फे सातवा जीएसटी दिवस साजरा करण्यात आला. कर्वेनगर येथील सीएमए भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सीएमए डॉ. संजय भार्गवे यांचे भाषण झाले. प्रसंगी ‘आयसीएमएआय’चे केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नीलेश केकाण, माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, उपाध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सचिव सीएमए राहुल चिंचोळकर, खजिनदार सीएमए हिमांशू दवे आदी उपस्थित होते.

डॉ. प्रणाली खडसे-धांडे म्हणाल्या, “सात वर्षांपूर्वी ‘एक देश एक कर’ संकल्पने अंतर्गत जीएसटी कायदा लागू झाला. सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, जीएसटी परिषदेने याबाबत सातत्याने बैठका घेत यामध्ये सुलभता कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. यामध्ये कर प्रणालीतील तज्ज्ञांचे इनपुट्स महत्वाचे ठरत आहे. करदाता आणि शासन यांच्यात दुवा म्हणून काम करणारे सर्वच आर्थिक सल्लागार जीएसटीच्या सुलभतेसाठी सातत्याने नवनवे बदल सुचवत आहेत. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून येत्या काळात जीएसटी प्रणाली आणखी सुलभ होईल.”
डॉ. संजय भार्गवे म्हणाले, “जीएसटीमुळे देशाच्या करसंकलनात मोठी वाढ झाली आहे. जीएसटी येण्याआधी प्रत्येक राज्यात व्हॅट वेगवेगळा होता. यातील तफावत अनेकदा व्यावसायिकांसाठी त्रासदायक होती. मात्र, जीएसटी आल्याने ‘एक देश एक कर’ ही कल्पना रूढ होत आहे. कर रचनेतील बदल होण्यासाठी अजूनही वाव आहे. त्यावर सातत्याने विचारविनिमय होत असून, येत्या काळात जीएसटीमध्ये आणखीन बदल होतील. करदात्यांना करभरणा अधिक सुलभ, उद्योगांना जीएसटी प्रणाली अनुकूल करण्यावर भर दिला पाहिजे. पेट्रोलियम कंपन्यांना जीएसटीमध्ये आणण्यासाठी भविष्यात प्रयत्न व्हावेत. जेणेकरून इंधनाचे दर खाली येतील आणि सर्वच क्षेत्रात त्याचा लाभ होईल. “

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इंडिगो 1,000 हून अधिक पायलटची भरती करणार

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो मोठ्या प्रमाणावर वैमानिकांची भरती...

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : गोपाळकृष्ण पिल्लई

सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान पुणे :  रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली. सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे  टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते. पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले. इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे.. सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो. जबाबदारी...

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14...

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या...