विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली:संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, मुख्यमंत्र्यासह हजारो वारकरी विठू नामात तल्लीन

Date:

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालखीचे आज आळंदी येथील देऊळवाड्यातून प्रस्थान झाले. यावेळी राज्यभरातील हजारो वारकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, यंदा माऊलींच्या पालखीच्या बैलजोडीचा मान आळंदी गावातील कुऱ्हाडे कुटुंबाला मिळाला आहे. या माध्यमातून या कुटुंबाची तब्बल 25 वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे.
यंदा संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळ्याचे हे 193 वे वर्ष आहे. आज दुपारी 4 वा. पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. आज पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथीलच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल. त्यानंतर उद्या 30 जून रोजी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल.
16 जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचणार
15 जुलै रोजी पालखी वाखरीला पोहोचेल. तर 16 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल. 17 जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा आहे. त्यामुळे 20 जुलैपर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीतच राहील. त्यानंतर 21 जुलै रोजी वारकरी पालखीसह ग्यानबा तुकारामचा जयघोष करत परतीच्या प्रवासाला आळंदीच्या दिशेने निघतील.
बैलजोडीचा मान कुऱ्हाडे कुटुंबाला
माऊलींच्या पालखीचा बैलजोडीचा मान यंदा आळंदी येथील कुऱ्हाडे कुटुंबाला मिळाला आहे. यंदा बैलजोडीच्या मानासाठी कुऱ्हाडे घराण्यातील 7 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी व हौश्या या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा मान मिळाला. या कुटुंबाला तब्बल 25 वर्षांनंतर हा मान मिळाला आहे. या बैलांची दरवर्षीप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
संत तुकारामांच्या पालखीचा आज आकुर्डीत मुक्काम
दुसरीकडे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात ही पालखी 16 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. ही पालखी आज शनिवारी 29 जून रोजी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल. संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामाला थांबेल.
पालखी मार्गावर विविध सोईसुविधा
पालखीच्या मार्गावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर उपलब्ध केले आहेत. सिद्धबेट, नदी घाट, नवीन पुलासह संपूर्ण महत्त्वाच्या ठिकाणीची स्वच्छता पूर्ण झाली आहे. वारी कालावधीत 3 पाळ्यांमध्ये साफसफाई केली जाणार आहे. 1800 फिरत्या शौचालयांची उपलब्धता केली आहे. दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहे. 60 ठिकाणी 130 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या प्रकरणी 3 बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...