जालना –
सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन सरकारने दिले. एक- दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर हाके यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.लक्ष्मण हाकेंचे उपोषण अखेर स्थगित:सरकारच्या शिष्टमंडळाला यश, OBC आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची दिली ग्वाही
सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन सरकारने दिले. एक- दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर हाके यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
दरम्यान, मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पित हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
यावेळी हाके म्हणाले, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आम्ही आंदोलन स्थगित केले, थांबवले नाही. आमच्या दोन मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. आम्ही आक्षेप घेतलेल्या हरकतींची श्वेतपत्रिका काढावी. तसेच सगे सोयऱ्यांचे आरक्षण देणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवत राहू”, असे हाके म्हणाले.
हम किसीके बाप से नहीं डरते- भुजबळ
यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. ”आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. जमाना जानता हैं हम किसीके बाप से नहीं डरते. आपल्याला या दोघांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. लढण्यासाठी दोन्ही वाघ पुन्हा मैदानात पाहिजे आहेत. आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला तुम्ही वेगळे आरक्षण द्या. ”, असे भुजबळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले.तसेच ”बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात आला. त्या कधीही कोणाच्या विरोधात बोलल्या नाहीत. तरीही काहींनी त्यांना विरोध केला. गरिबांना अधिक देण्याचे काम केले पाहिजे. जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. ही लढाई अजून संपलेली नाही. राज्यातील अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले. आपल्यावर अन्याय होतोय, अजून किती सहन करणार असे म्हणत हातात हात धरून बसलात तर काहीही होणार नाही”, असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.
यावेळी हाके म्हणाले, दहा दिवस झाले तरी इकडे कोणी फिरकले नाही याचे दुःख आहे. ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. पंकजा मुंडे यांनाही पाडण्याचे काम करण्यात आले आहे. समाजाच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला ताकद मिळाली”, असे हाके म्हणाले.
आपण मांडलेले विषय सरकारपुढे मांडले. सरकारने देखील हे विषय गांभीर्याने घेतले आहेत. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तर सगे सोयरे हा शब्द नाही यावर सरकार ठाम आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण झाले पाहिजे असे मत गोपीचंद पडळकर यांनी मांडले आहे.उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली
दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. ओबीसी नेत्यांसोबत काल राज्य सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले आहे.