Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांशी आपली लढाई आहे:जयंत पाटील

Date:

पुणे/नारायणगाव : लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा द्वेष करणारे खासदार नकोत, अस म्हणत देशात इंडिया आघडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

नारायणगाव मध्ये आयोजित महाविकास आघाडीतील राशी7 काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, शिवसेना (उबाठा) नेते भास्करराव जाधव, सत्यशील शेरकर, उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, या निवडणुकीत 32-33 जागा महाविकास आघाडीच्या असतील. देशातल वार बदललं आहे. संविधान वाचवण्यासाठी, चुकीच्या पद्धतीने होणारी जीएसटीची आकारणी रोखण्यासाठी लोक आता एकत्र आलेत. त्यामुळे चारशे पारचा नारा देणाऱ्यांना आता दोनशे गाठतो का नाही याची चिंता लागली आहे. खोके घेऊन बोके घेणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्राची मानसिकता झाली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांना पाडायचे अनेक प्रयत्न झालेत. असे सांगत जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांची साथ सोडण्यासाठी, अमोल कोल्हेंवर जेवढा दबाब आला तेवढा कोणावर आला नाही. तरीही या दबावाला बळी न पडता, ते आपल्या तत्वांवर ठाम राहिले. त्यांचा पराभव करण्यासाठी बारा बारा सभा घ्यावा लागत

अनाजी पंताची ओळख करुन दिली, म्हणून मूठभर लोकांना त्रास

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगताना अनाजी पंताची ओळख महाराष्ट्राला करुन दिली.म्हणून काही मूठभर लोक चिडून आहेत. पण ही लढाई तत्वांची, विचारांची आहे.


अमोल कोल्हे होणार कारभारी जयंत पाटलांनी केलं स्पष्ट

तीन महिन्याने विधानसभा येणार आहेत, आपलं सरकार येणार आहे, आणि अमोल कोल्हे जे म्हणतील तेच या भागात होणार आहे, अस सांगत जयंत पाटील यांनी डॉ. कोल्हे हेच आता कारभारी असतील हे स्पष्ट केल.

ही लढाई तत्वांची, विचारांची आहे. खोके घेऊन बोके झालेल्याना लोक आता धडा शिकवणार आहेत.
अमोल कोल्हेंना पाडायचे किती प्रयत्न करावेत, अमोल कोल्हे काम करत नव्हते, लढायला तयार नव्हते अस सांगता तर बारा बारा सभा का घेता, असा सवाल अजित पवार यांचे नाव न घेता जयंत पाटलांनी केला.लोकसभेत प्रेमाने मत मागावी, मग दोनाची चार होतात, पण दमबाजी केली की आठाची दोन होतात. 4 जूनला आढळरावांना समजेल, प्रचार त्यांचा होता की कोल्हेंचा होता, असा टोलाही लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...