गोळवलकर गुरुजींच्या विचाराचे हिंदू राष्ट्र निर्माण करणे, मनुस्मृतीच्या तत्वावर घटनेत बदल करणे भाजपचा हेतू

Date:

पुणे-संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड येथे म्हणाले कि,’लोकशाहीमध्ये घटना हि अत्यंत महत्वाची असते आणि घटनेची जी तत्वे आहेत, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचे बंधुत्व ,डॉ. आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्य , स्वराज्य हि महाराष्ट्राने घटनेला दिलेली विचारधारा आहे , या विचार धरलाच धोका निर्माण झाला आहे. हि घटना , लोकशाही , देश सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला काल संभाजी ब्रिगेडची नासिक येथे बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. १९२५ला डॉ हेगडेवारांनी नागपूरला आर एस एस स्थापना केली. त्यानंतर द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी यांनी एक पुस्तक लिहिले. बेंच ऑफ थॉट्स नावाचे . त्यानंतर हा देश कसा असावा याच्यासाठी त्यांनी ३२ वर्षे काम केले. आणि तीच विचारधारा आर एस एस ची झाली. आता पुढच्या वर्षी या आर एस एस ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत . त्यामुळे देशात आणि राज्य राज्यात त्यांना भाजपाचे सरकार कोणत्याही परिस्थितीत आणायचे आहे. गोळवलकर गुरुजींच्या विचाराचे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यासाठी २ तृतीयांश बहुमत ४०० पारचा नारा आहे आणि त्याद्वारे राज्यघटना मनुस्मृतीच्या तत्वावर नेणे , जिथे संत तिथे विषमता ,जिथे न्याय तिथे अन्याय राहील,अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. कारण पूर्वीच्या काळात या देशात तशी स्थिती होती .ती निर्माण करण्यासाठी गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या देशात विविध जाती धर्म, प्रांत , भाषा असताना विविधतेने नटलेल्या आणि सौख्य लाभलेल्या देशात अशी स्थिती निर्माण करणे व्याव्हारिकच नाही तर अत्यंत धोकादायक असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....