चंद्रपूर – राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मॅच फिक्सिंग केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याबरोबरच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारीने केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला. शाहू महाराजांचे वंशज कोण आहेत? हे सर्व जगाने मान्य केले आहे. असे असताना देखील दोन गाढवाने त्यावर बोलावे, त्यावर काहीही बोलण्याची आवश्यकता नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.शाहू महाराजांचे कुटुंबीयांना जगाने स्वीकारले आहे. त्यांच्या जवळचे माणसे आणि त्यांचे कुटुंबीय कोण, हे सर्वांनाच माहिती आहे. एकदा जगाने मान्य केल्यानंतर दोन गाढवांनी त्यावर कमेंट करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाआघाडीचे उमेदवार शाहू महाराज हे घराण्याचे खरे वारसदार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याचा प्रकाश आंबेडकर यांनी चांगला समाचार घेतला.पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वेळेस पडलेल्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. अशी अनेक नावे आहेत, जी सांगू शकतो. नवीन चेहरे असताना देखील पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ही मॅक्स फिक्सिंग असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात देखील एकनाथ शिंदे यांनी जुन्या उमेदवारालाच उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पीएला तेथे उमेदवार दिली आहे. ही मॅक्स नाही का? असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
शाहू महाराजांविषयी गाढवांनी बोलू नये:प्रकाश आंबेडकर म्हणाले ; उद्धव ठाकरे, शरद पवारांचेही मॅच फिक्सिंग
Date:

