पुणे-ज्यांनी पक्षांतरबंदी कायदा आणला त्याच कॉंग्रेसने निष्ठावंतांवर अन्याय करून पक्ष बदलून आलेल्यांना पायघड्या टाकू नये अशी मागणी आता रवींद्र धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी आघाडीवर असल्याच्या बातम्यांच्या आधारे केली जाते आहे,निष्ठावंतांवर अन्याय करून अशा पद्धतीने उमेदवारी दिली तर कठीण आहे असाही सूर आवळला जातोय कॉंग्रेस मधील लोकसभा इच्छुकांमधील स्पर्धा आता तीव्र होत असून यात आबा बागुल यांच्यावर पक्षाने अन्याय चालविला असल्याचे वातावरण पसरते आहे.7 वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना नगरसेवकाची,आमदारकीची उमेदवारी मिळाली,पण पक्षात हयात घालविलेल्या,३० वर्षे नगरसेवक राहिलेल्या आबा बागुलांना लोकसभा मागावी लागते आणि तरीही उमेदवारी मिळेना या वातावणामुळे पक्षाच्या मतदारांपर्यंत निष्ठावांतांची पक्षातील दुरवस्था पोहोचू पाहते आहे.
पुण्यात लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ किंवा जगदीश मुळीक यांना भाजपने उमेदवारी दिली तर कॉंग्रेसला पुण्याचा हातून निसटलेला बालेकील्ला सहज पुन्हा मिळविता येईल असे स्पष्ट चित्र असल्याचा दावा सगळीकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ३० वर्षे नगरसेवक म्हणूनच पक्षात कार्यरत राहिलेले आबा बागुल यांनी आपल्या निष्ठेच्या आणि कामाच्या बळावर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाली…आणि आमदार धंगेकर यांच्यापासून शहर अध्यक्ष,माजी शहर अध्यक्ष या सर्वांनी त्यांच्या निष्ठेला साथ दिली तर निष्ठावंतांना कॉंग्रेस पक्ष विसरत नाही त्यांच्या पाठीशी राहतो असाच संदेश जाईल.मात्र कॉंग्रेसचे प्रादेशिक नेते आबा बागुलांच्या पाठीशी का राहत नाहीत ?हे गूढ अद्याप उकलेनासे झाले आहे. धंगेकर यांचे नाव निश्चित होईल असे सांगून त्यामागे जो ‘निवडून येण्याचा ‘निकष लावला जातोय, तोच निकष बागुल यांच्या बाबत मान्य का होत नाही ? असा प्रश्न विचारला जातोय.काँग्रेसकडून कसब्याचे आमदार धंगेकर यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.लोकसभेसाठी ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा माध्यमातून आणि फलक बाजीतून होते आहे, त्या धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी निश्चित झाल्याचे वारंवार सांगितले जातेय,यामुळे तर परंपरागत कॉंग्रेसचे काम करणारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते हतबल झालेत.आणि ‘या पक्षात आता जे जे होईल तेते पाहतच कुठवर बसायचे ?’ असा सवाल विचारला जात असताना मोहन जोशींनी मोरेंची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली गेली. आणि धंगेकर यांचे नाव आघाडीवर असताना लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहन जोशी यांनी मनसे तून बाहेर पडलेल्या माजी नगरसेवक मोरे यांची भेट घेतली आणि हि भेट त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी घेतली गेल्याची अफवा जोरदारपणे पसरली,आपण भेट घेतली पण यात लोकसभाच काय विधानसभेच्या उमेदवारीचा देखील काही संबध नाही,कात्रजमध्ये ते कॉंग्रेस वाढवू शकतील काय ? या विचाराने आपण मोरेंची भेट घेतल्याचा दावा मोहन जोशींनी केला तर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले त्यांनी लोकसभेचे काही बोलणे केले असेल तर ते कशाच्या आधारे केले याबाबत माहिती घ्यावी लागेल, मात्र स्थानिक अध्यक्ष म्हणून याबाबत आपल्याशी काहीही बोलणे झालेले नही अगर आपणास काहीही माहिती नाही.दरम्यान मोहन जोशी,अरविंद शिंदे,अभय छाजेड हे निष्ठावंतच आहेत आणि तेही लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेतच प्रादेशिक नेते आणि दिल्लीश्वर कुणाच्या पारड्यात ‘न्याय’ टाकतात हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.